शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

इंडिया नव्हे,‘भारत’च?; विशेष अधिवेशनात विधेयक? राष्ट्रपतींचा उल्लेख ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 6:18 AM

संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात देशाचे नाव ‘भारत’ करण्यासाठी केंद्र सरकार विधेयक पारित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

- संजय शर्मानवी दिल्ली : देशाचे नाव आता ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ करण्यासाठी केंद्रीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-२० देशांच्या राष्ट्राध्यक्षांसाठी आयोजित स्नेहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर मुर्मू यांचा उल्लेख ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा करण्यात आला आहे. त्यावरून जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात देशाचे नाव ‘भारत’ करण्यासाठी केंद्र सरकार विधेयक पारित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

किती देशांनी बदलले नाव? आतापर्यंत सिलोनचे श्रीलंका, बेचुयानालँडचे बोत्सवाना, एबिसिनियाचे इथिओपिया, ट्राजार्डेनचे जॉर्डन, बर्माचे म्यानमार, तुर्कीएचे तुर्की, हॉलंडचे नेदरलँड, फारसचे इराण व सियामचे थायलँड असे नामांतर झाले.

आरोप-प्रत्यारोप ‘भारत’ नावावर राजकीय वादही सुरू झाला आहे. विरोधी पक्ष काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप व राजदने यावर टीका केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी ‘इंडिया’ आघाडीला घाबरूनच देशाच्या नावातून ‘इंडिया’ हटवण्यात येत असल्याचे म्हटले आहे. ‘इंडिया’ हे नाव विरोधकांच्या आघाडीला जोडले गेल्यामुळे नेत्यांवर किंवा आघाडीवर थेट हल्लाबोल करता येत नाही, ही बाब भाजप नेत्यांनीही स्वीकारली आहे. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आघाडीला आपल्या भाषेत ‘घमंडिया आघाडी’ हे नाव दिले आहे.

मोहन भागवत यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला जोर

संसदेचे विशेष अधिवेशन अचानक का बोलावले, याचा अजेंडा आता स्पष्ट होत आहे. ‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावर चर्चा रंगली असतानाच आता देशाचे नाव बदलण्याची तयारी केली जात आहे. त्याचा प्रत्यय जी-२० च्या स्नेहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा केला.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी दोन दिवसांपूर्वी देशातील लोकांनी जगात कुठेही गेले, तरी स्वत:ला ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ देशाचा नागरिक म्हणण्यास सुरुवात करावी, असे म्हटले होते. त्याच अनुषंगाने विशेष अधिवेशनात प्रस्ताव सादर करण्याची तयारी केली जात आहे.

देशाच्या सन्मान आणि गौरवाशी निगडित प्रत्येक विषयावर काँग्रेस दरवेळी का आक्षेप घेते? भारत जोडो नावाने यात्रा करणाऱ्यांना ‘भारतमाता की जय’ उद्घोष करणाऱ्यांविरोधात इतका द्वेष का?     - जगत प्रकाश नड्डा, अध्यक्ष, भाजपइंडिया म्हणजेच भारत, हे संघराज्य आहे. एक देश, एक निवडणूक हा संघराज्य प्रणाली व त्याच्या सर्व राज्यांवर हल्ला आहे.    - राहुल गांधी, काँग्रेस नेते.‘इंडिया’ हा भारत आहे, त्यामुळे अचानक असे काय झाले की, देशाने फक्त भारतच म्हणायला हवे. आपण देशाला भारत म्हणतो, इंग्रजीत ‘इंडिया’. त्यात नवीन काही नाही. देशात इतिहासाचे पुनर्लेखन केले जात आहे.    - ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, प. बंगाल सध्या जनतेत ‘इंडिया’ला ज्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे नाव काढण्याचा प्रयत्न केला जात असेल. मात्र, इंडिया हे नाव हटविण्याचा कोणालाही अधिकार नाही.     - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाcongressकाँग्रेस