शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

केवळ पुस्तकी ज्ञान नको, शिक्षण क्षेत्रात भारताला मोठा पल्ला गाठायचा आहे: बिल गेट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 13:50 IST

मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ आणि भारतातील आरोग्य क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात देणग्या देणारे समाजसेवक बिल गेट्स यांनी भारतातील विद्यमान शिक्षण पद्धतीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

मुंबई : मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ आणि भारतातील आरोग्य क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात देणग्या देणारे समाजसेवक बिल गेट्स यांनी भारतातील विद्यमान शिक्षण पद्धतीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.भारतातील शिक्षण क्षेत्रावर सावध टीका करताना बिल गेट्स म्हणाले, भारताविषयीचे माझे मत तसे सकारात्मक असले तरी येथील शिक्षण व्यवस्थेबाबत मात्र मी फार निराश आहे. ही शिक्षण व्यवस्था अधिक चांगली असायला पाहिजे. मला त्यावर टीका करायची नाही. परंतु मला त्याबाबत ब-याच चांगल्या अपेक्षा आहेत.’तथापि शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याच्या संदर्भात आपल्या तूर्तास कोणत्याही योजना नाहीत, असे गेट्स यांनी स्पष्ट केले. आरोग्य क्षेत्राकडून शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्याकडे वळणार काय, असा प्रश्न विचारला असता त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही. ‘आपण सर्वच काही करू शकत नाही. भारतातील बहुतांश समाजसेवकांनी शिक्षण क्षेत्र निवडले आहे आणि त्याचा मला आनंद आहे,’ असे ते म्हणाले.केवळ पुस्तकी ज्ञान बाळगण्याची प्रवृत्ती चांगली नाही, असे सांगून ते म्हणाले, ‘मागील दोन दशकात भारताने मोठी भरारी घेतली आहे. विकासाचे चांगले संकेत मिळत आहेत. परंतु या उपलब्धीचा योग्य फायदा करण्याची आणि आपल्या मानव विकास निर्देशांकाचा परिपूर्ण वापर करण्याची गरज आहे. हे सर्व काही केवळ दर्जेदार शिक्षणामुळे घडेल आणि भारताच्या विकासाचा चढता आलेख कायम राखण्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे.’बालकांना त्यांच्या लहान वयात केवळ चांगले आरोग्य आणि पोषणहार देणेच गरजेचे नाही तर त्यांना चांगले शिक्षणदेखील दिले गेले पाहिजे. शिक्षणामुळे मोठे झाल्यावर त्यांची कमावण्याची क्षमताही वाढेल. या संदर्भात बरेच काही करण्याची गरज आहे. परंतु या क्षेत्रात भारताला अद्याप मोठा पल्ला गाठावयाचा आहे, असे बिल गेट्स म्हणाले.

टॅग्स :Bill Gatesबिल गेटसeducationशैक्षणिकIndiaभारत