शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

काश्मीरच नव्हे भारतातील "या" राज्यांमध्ये पाकिस्तान जिंकल्यानंतर फुटले फटाके

By admin | Published: June 22, 2017 8:50 AM

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारतावर मिळवलेल्या विजयाचा आनंदोत्सव फक्त काश्मीरमध्येच साजरा करण्यात आला नसून...

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 22 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारतावर मिळवलेल्या विजयाचा आनंदोत्सव फक्त काश्मीरमध्येच साजरा करण्यात आला नसून, देशाच्या अन्य काही भागातही असे प्रकार घडले आहेत. राजस्थानमध्ये पाकिस्तानचा विजय साजरा करणा-या पाच जणांवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. तीन राज्यांमध्ये पाकिस्तान जिंकल्याचा आनंद साजरा करण्यात आल्याच्या घटना घडल्या असून, तीन अल्पवयीन मुलांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
 
मध्यप्रदेशात पाकिस्तान जिंकल्याच्या आनंदात फटाके फोडून घोषणाबाजी करणा-या 15 जणांना अटक केली आहे. देशद्रोहाच्या आरोपाचा गुन्हा सिद्ध झाला तर, दोषीला आयुष्यभरासाठी तुरुंगवास होऊ शकतो. राजस्थान बिकानेरमधून अटक केलेल्या पाच जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी फायनलमध्ये पाकिस्तानने विजय मिळवल्यानंतर सुभाषपूरा येथील मुस्लीम युवक ड्रम वाजवून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत होते. स्थानिक रहिवाशांनी याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. 
 
या पाचही जणांना न्यायालयीने कोठडी सुनावण्यात आली आहे. हिंदू जागरण मंच आणि अन्य संघटनांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पत्र दिले असून त्यांनी कठोरात कठोर कारवाईची मागणी केली आहे. भारतीय संघाच्या पराभवाने काश्मीरमधील फुटिरतावाद्यांना आपल्या भारतद्वेशाला मोकळी वाट करून देण्याची संधी मिळाली. चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानचा विजय झाल्यावर फुटिरतावाद्यांनी फटाके फोडून जल्लोश केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत., त्यांनी भारतविरोधी घोषणाही दिल्या. 
 
आणखी वाचा 
 
श्रीनगरमध्ये तरुणांनी फटाके फोडून पाकिस्तानचे झेंडे फडकवून आनंद साजरा केला. भारतविरोधी घोषणाबाजीही केली. श्रीनगरमधील फतेहकदाल, साकीदफर आणि अनंतनाग येथे पोलिस आणि लष्कराच्या तळांवर फटाके फेकणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्रालमध्ये सुद्धा पाकिस्तानच्या विजयानंतर महिला आणि पुरुषांनी रस्त्यावर उतरून पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोश साजरा केला. 
 
दरम्यान केंद्रातल्या मोदी सरकारवर देशद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर केल्याचा आरोप झाला आहे. एखाद्या मुद्यावर मतभेद असले तर ते समजून न घेता केंद्रातील भाजपा सरकार देशद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर करते असा आरोप  विरोधकांनी केला होता.