शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

हे ‘रॉबिन हूड’ बजेट नाही !

By admin | Published: March 01, 2016 4:01 AM

हा अर्थसंकल्प समाजातील दुर्बल घटक आणि मध्यमवर्गाला दिलासा देणारा आहे. श्रीमंतांकडून फार काही घेऊन ते गरिबांना दिले गेले, असे नाही. त्यामुळेच यास ‘रॉबिन हूड बजेट’ म्हणता येणार नाही

हा अर्थसंकल्प समाजातील दुर्बल घटक आणि मध्यमवर्गाला दिलासा देणारा आहे. श्रीमंतांकडून फार काही घेऊन ते गरिबांना दिले गेले, असे नाही. त्यामुळेच यास ‘रॉबिन हूड बजेट’ म्हणता येणार नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.श्रीमंतांकडून खूप काही घेतले गेले आहे, असे मला वाटत नाही. सुपररिच (१ कोटीपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असणारे) करदात्यांसाठी प्राप्तीकरावरील अधिभार १२ टक्क्यांवरून १५ टक्के करण्यात आला असला तरी यामुळे केवळ ०.६ टक्के परिणाम संभवतो. अशा स्थितीत श्रीमंतांकडून फार काही घेण्यात आले, असे मला वाटत नाही. रॉबिन हूड तर यापेक्षा कितीतरी अधिक घेऊन जात होता, असे जेटली म्हणाले. कृषी क्षेत्र सध्या दबावाखाली आहे. त्यामुळे सर्वाधिक भर याच क्षेत्रावर देण्यात आला आहे.‘आधार’ संबंधित कायद्याबाबतचा निर्णय हा या अर्थसंकल्पातील सर्वाधिक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. येत्या एक-दोन दिवसांत या कायद्याबाबत घोषणा होईल.> नऊ आधारस्तंभभारताचे परिवर्तन घडवून आणणे हा मुख्य अजेंडा डोळ्यांपुढे ठेवून तयार केलेल्या या अर्थसंकल्पाचे प्रामुख्याने नऊ आधारस्तंभ वित्तमंत्र्यांनी विशद केले. शेती व शेतकरी कल्याण :शेतकऱ्यांचे उत्पन्न पाच वर्षांत दुप्पट करण्यावर विशेष भर.ग्रामीण क्षेत्र :ग्रामीण रोजगार व पायाभूत सोयीसुविधांवर विशेष भर.आरोग्यसेवांसह सामाजिक सेवा :सर्व नागरिकांना कल्याणकारी व आरोग्यसेवांचे लाभ पुरविणे.शिक्षण, कौशल्ये व रोजगार :भारतीय समाजास माहितीसंपन्न व उत्पादक बनविणे.पायाभूत सुविधा, गुंतवणूक :कार्यक्षमता, राहणीमान दर्जा उंचावणे.वित्तीय क्षेत्रांतील सुधारणा : यामध्ये पारदर्शकता व स्थैर्य आणणे. शासनव्यवहार व उद्यम सुगमता : लोकांना आपापल्या क्षमतांचा पूर्ण विकास करण्याची संधी देणे.वित्तीय शिस्त :सरकारी वित्तसाधनांचा किफायतशीर वापर व नेमक्या गरजूंना लाभ पोहोचविणे.कर सुधारणा : लोकांच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून करवसुलीचा भार कमी करणे.