शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

अरे व्वा! संपूर्ण जगाला कोरोनाचा विळखा मात्र देशातील "या" ठिकाणी एकही रुग्ण नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 12:03 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 97,67,372 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 31,522 नवे रुग्ण आढळले आहेत.

नवी दिल्ली - संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने सहा कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 97,67,372 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 31,522 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 412 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,41,772 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र केंद्रशासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीपमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. 

लक्षद्वीपमधील जनजीवन नेहमीप्रमाणे सर्वसामान्य आहे. येथे आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. ना मास्क, ना सॅनिटायझर आणि कोविड-19 च्या इतर अनेक नियमांचा कोणताही प्रकार येथे पाहायला मिळत नाही. लग्न समारंभापासून ते इतर अनेक कार्यक्रमांतर्गत येथे लोक नेहमी सारखेच एकमेकांना भेटत आहेत. लक्षद्वीपमध्ये सर्वकाही सर्वसामान्यपणे होत आहे याचे कारण अरबी समुद्रात असलेल्या या द्वीपावर लोकांनी सहज प्रवेश करू नये म्हणून एसओपीचे अतिशय कठोरपणे पालन केले जाते. 

सर्वसामान्य असो किंवा अधिकारी वा जनप्रतिनिधी, 7 दिवस क्वारंटीन राहिल्यानंतरच प्रवेश

लोकसभेत लक्षद्वीपचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार पी. पी. मोहम्मद फैजल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या सुरुवातीलाच लक्षद्वीपने कोविड-19 च्या महासाथीला रोखले होते. आठ डिसेंबरपर्यंत लक्षद्वीपमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही. "आम्ही घेतलेल्या काळजीमुळे आतापर्यंत लक्षद्वीपमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. कडक नियमांचे पालन केल्यानंतरच 36 वर्ग किलोमीटरच्या या द्वीपावर प्रवेश मिळू शकतो. मग ती एक सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा मग अधिकारी वा जनप्रतिनिधी. सर्वांनाच कोच्चीमध्ये सात दिवसांसाठी क्वारंटाईन राहण्याबरोबरच इतर अनेक नियमही पाळावे लागतात" असं त्यांनी म्हटलं आहे. 

कोच्ची हा एक असा पॉइंट आहे जेथे जहाज किंवा मग हेलिकॉप्टरद्वारे द्वीपापर्यंत जाता येते. द्वीपावर मात्र लोकांसाठी कोणत्याही प्रकारचे नियम आणि बंधने नाहीत. ना मास्क, ना सॅनिटायझर... कारण हे एक हरित क्षेत्र असल्याची माहिती फैजल यांनी दिली आहे. लक्षद्वीप अशी एकमात्र जागा आहे जेथे शाळा सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे 21 सप्टेंबरपासून शाळा उघडण्याची परवानगी दिली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत