शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

आता ब्रिटनमध्ये जाणं होणार अवघड

By admin | Published: November 05, 2016 12:04 AM

देशात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्थलांतराला चाप लावण्यासाठी ब्रिटनने व्हिसा धोरणात बदल केला असून, युरोपियन समुदायाबाहेरील नागरिकांसाठी व्हिसासंबंधीचे नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 4 -  ब्रिटनमध्ये भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. शिक्षण, रोजगाराच्या संधी यामुळे दरवर्षी हजारो भारतीय ब्रिटनमध्ये जात असतात. पण आता ही संख्या रोडावण्याची शक्यता आहे. देशात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्थलांतराला चाप लावण्यासाठी ब्रिटनने व्हिसा धोरणात बदल केला असून, युरोपियन समुदायाबाहेरील नागरिकांसाठी व्हिसासंबंधीचे नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या नियमाचा सर्वाधिक फटका भारतीय आणि भारतातून ब्रिटनमध्ये जाणाऱ्या आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.  
या बदललेल्या नियमांबाबतची घोषणा ब्रिटनच्या गृहमंत्रालयाने केला आहे. या नियमावलीनुसार 24 नोव्हेंबरनंतर एकाच कंपनीअंतर्गत बदलीसाठी आयसीटी व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या उत्पन्नाची मर्यादा 20 हजार 800 पौंडावरून 30 हजार पौंड करण्यात आली आहे.  आयसीटी व्हिसाचा वापर करून ब्रिटनमध्ये जाणाऱ्यांमध्ये 90 टक्के भारतीय असतात. त्यामुळे या नियमातील बदलाचा फटक सर्वाधिक प्रमाणात भारतीयांनाच बसणार आहे.  ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या भारत दौऱ्यापूर्वीच काही दिवस आधी हा निर्णय घेण्यात आला आहे. 
त्याबरोबरच  ब्रिटनचे नागरिकत्व मिळवण्यासाठीही आता कडक परीक्षा द्यावी लागणार आहे. नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्या  युरोपियन देशांबाहेरील  नागरिकांची इंग्रजीची अधिक आव्हानात्मक परीक्षा घेण्यात येणार आहे.