शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

आता गुजरातमधील गावात मुलींच्या मोबाईल वापरावर बंदी!

By admin | Published: February 23, 2016 1:23 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडियाचे स्वप्न बघत असताना त्यांच्याच राज्यात गुजरातमधील मेहसणा जिल्ह्याच्या एका गावात अल्पवयीन मुलींना मोबाईल फोन बाळगणे

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडियाचे स्वप्न बघत असताना त्यांच्याच राज्यात गुजरातमधील मेहसणा जिल्ह्याच्या एका गावात अल्पवयीन मुलींना मोबाईल फोन बाळगणे आणि त्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मोबाईलमुळे मुलींचे अभ्यासातून लक्ष विचलित होते, असा दावा ही बंदी घालणाऱ्यांनी केला आहे. ही बंदी केवळ शाळकरी विद्यार्थिनींपुरतीच मर्यादित असून महाविद्यालयीन विद्यार्थीनींना यातून सवलत देण्यात आली आहे. अलीकडेच उत्तरप्रदेशातील एका गावातही अशीच बंदी घालण्यात आली आहे. काडी तालुक्यातील सूरज गावच्या पंचायतीने हे निर्बंध लादले आहेत. अल्पवयीन मुलींजवळ मोबाईल दिसल्यास त्यांना २१०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. विशेष म्हणजे त्यांना त्यांच्या आई-वडिलाच्या मोबाईल फोनचा वापर करता येणार आहे पण फक्त घरात व तो त्यांच्याच देखरेखीखाली. त्यांना मोबाईल घेऊन गावात फिरता येणार नाही. गावाचे सरपंच देवशी वांकर यांच्या म्हणण्यानुसार मोबाईल फोन मुली आणि त्यांच्या आईवडिलांसाठी त्रासदायक ठरत असल्याचे बहुतांश गावकऱ्यांचे मत असल्याने सर्व सहमतीने हा निर्णय घेण्यात आला. तरुण प्रेमीयुगुल घरातून पळून जाण्यासाठीही सेलफोनचा वापर करीत असल्याचा निष्कर्ष पंचायतीने काढला आहे. दलित, पटेल, ठाकूर, रबाडी अशा सर्व समुदायाच्या लोकांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना चांगल्या वाईटाची समज असते. शिवाय गावात कॉलेज नसल्याने त्यांना जवळच्या शहरांमध्ये जावे लागते. अशा परिस्थितीत आईवडिलांच्या संपर्कात राहण्यासाठी त्यांना मोबाईलची गरज असते. त्यामुळे त्यांना या बंदीतून वगळण्यात आले असल्याचे वांकर यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)मोबाईल फोनमुळे मुलींचे अभ्यासातून मन विचलित होते. त्या तासन्तास गेम खेळत बसतात आणि अभ्यासात लक्ष घालत नाहीत.मोबाईलच्या वापरामुळे त्यांच्या गरीब आईवडिलांवर विनाकारण आर्थिक बोजा पडतो. अलीकडील काळात अल्पवयीन मुलींचे मुलांसोबत पळून जाण्याचे प्रमाण वाढले असून यालाही मोबाईलच जबाबदार आहे.नुकत्याच झालेल्या पंचायतीच्या बैठकीत मुले मोबाईलच्या माध्यमाने मुलींच्या संपर्कात राहात असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. या सोईचा गैरवापर ते पळून जाण्यासाठी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. - रामजी ठाकूर, माजी सरपंच