शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

Amit Shah in NDRF: आता कितीही मोठे वादळ आले, 'हम संभाल लेंगे'; अमित शहा गरजले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 13:24 IST

Amit Shah in NDRF: काश्मीर झाले की केरळ, इकडे गुजरात झाले की युपी, बिहार, पश्चिम बंगाल, संकटांमागून संकटे येत आहेत. देशावर गेल्या काही वर्षांपासून आस्मानी संकटांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली : देशावर गेल्या काही वर्षांपासून आस्मानी संकटांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. एकामागोमाग एक अशी संकटे येत आहेत. काश्मीर झाले की केरळ, इकडे गुजरात झाले की युपी, बिहार, पश्चिम बंगाल. परंतू एनडीआरएफ एकटेच आमच्या निम्म्या चिंता दूर करते, अशा शब्दांत केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी आपत्ती व्यवस्थापन दलांची स्तुती केली. 

जेव्हा आमच्याकडे कोणत्याही संकटाचा अलर्ट येतो आणि आम्हाला जेव्हा समजते की एनडीआरएफ आणि एसडीआरएफ तेनात झाले आहे, तेव्हा आमच्या निम्म्या चिंता संपलेल्या असतात. कारण आम्हाला आता एनडीआरएफ सर्व संकट सांभाळेल, असा विश्वास वाटतो. आपत्ती प्रतिसादासाठी क्षमता वाढवण्याच्या वार्षिक परिषदेला शहा संबोधित करत होते. 

NDRF ने आता जगभरात प्राकृतिक संकटांच्या क्षेत्रात आपले नाव कमविले आहे. अनेकदा शेजारी देशांमध्ये जाऊनही या दलाने माणुसकी निभावली आहे. २०१६ मध्ये मोदींनी एनडीएमए आणि एनडीएमपी सुरु केले होते. केंद्र सरकार सर्व प्रकारच्या संकटांवर सतत काम करत आहे. आतापर्यंत २६ राज्यांत आणि केंद्र शासित प्रदेशांच एसडीआरएफची स्थापना झाली आहे, असे शहा म्हणाले. 

देशात संसाधने आहेत म्हणून किंवा संशोधन करून काहीही होत नाही. तर प्रत्यक्षात संशोधनाची अंमलबजावणी करण्यासाठी एका शक्तीची गरज आहे. यासाठी एनडीआरएफ प्रशंसनीय काम करत आहे. 2001 च्या गुजरात भूकंपात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. 1999 मध्ये ओरिसामध्ये आलेले सुपर चक्रीवादळ देखील पाहिले, ज्यामध्ये हजारो लोक मरण पावले. आज आपण एनडीआरएफमुळे इतके सक्षम झालो आहोत की आता कितीही मोठे चक्रीवादळ आले तरी आम्ही त्याचा सामना करू, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहcycloneचक्रीवादळ