शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

आता शाळेमध्ये ‘गुड मॉर्निंग’ नव्हे ‘जय हिंद’ बोला! १५ ऑगस्टपासून हरयाणातील शाळांमध्ये उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 10:11 IST

१५ ऑगस्टपासून शाळांमध्ये हा आदेश लागू करण्यात आला आहे.

चंदीगड : हरयाणातील सर्व शाळांमध्ये या स्वातंत्र्य दिनापासून आता ‘गुड मॉर्निंग’च्या जागी ‘जय हिंद’ बोलण्यात येणार आहे. ‘जय हिंद’ बोलल्याने विद्यार्थ्यांना देशाच्या स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची आठवण येत राहील, असे असे सरकारने म्हटले आहे. १५ ऑगस्टपासून शाळांमध्ये हा आदेश लागू करण्यात आला आहे.

१५ ऑगस्ट रोजी शाळांमध्ये देशभक्तीचे वारे वाहू लागतील आणि मुले एकमेकांना शिवाय आपल्या शिक्षकांना जय हिंद म्हणतील, अशा सूचना शिक्षण संचालकांनी जिल्हा व गट अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्राचार्य आणि मुख्याध्यापक ही व्यवस्था अमलात आणतील.

‘जय हिंद’च का?- ‘जय हिंद’ ही घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान दिली होती आणि स्वातंत्र्यानंतर सशस्त्र दलांनी सलामी म्हणून ती स्वीकारली होती, असे परिपत्रकात म्हटले होते.- शालेय शिक्षण संचालनालयाने हे परिपत्रक सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा गटशिक्षणाधिकारी, गट प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांना पाठवले आहे.

उद्देश काय?एका सरकारी परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. हरयाणा सरकारने सुरू केलेल्या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत करणे आहे, असे राज्य सरकारच्या शालेय शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

काय आहे परिपत्रकात? परिपत्रकानुसार, ‘गुड मॉर्निंग’ ऐवजी ‘जय हिंद’ आता शाळांमध्ये वापरण्यात येणार आहे, यामुळे विद्यार्थी दररोज ‘राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेने प्रेरित’ होऊन देशाच्या समृद्ध इतिहासाबद्दल आदर व्यक्त करू शकतील.

देशभक्तीपर अभिवादन ‘जय हिंद’ विद्यार्थ्यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीरांच्या केलेल्या बलिदानाचे स्मरण करण्यास प्रोत्साहित करेल. ‘जय हिंद’ प्रादेशिक, भाषिक आणि सांस्कृतिक भेदांच्या पलीकडे जाऊन विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांमध्ये एकतेला प्रोत्साहन देते, असे परिपत्रकात म्हटले आहे. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीHaryanaहरयाणा