शहरं
Join us  
Trending Stories
1
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
2
राहुल गांधींनी मानले सर्व कार्यकर्त्यांचे आभार; हरयाणातील पराभवावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
4
"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
5
हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?
6
माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
7
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
8
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
9
जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  
10
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात चांदी ₹२१२२ स्वस्त; Gold किती घसरलं?
11
₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट
12
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
13
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
14
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
15
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
16
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
17
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
18
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
19
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
20
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट

आता एन्काउंटर सुरू आहे, तुमच्याशी नंतर बोलतो... कर्नल मनप्रीत सिंह यांचा तो कॉल ठरला अखेरचा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 7:24 AM

Indian Army: ‘आता एन्काउंटर सुरू आहे, नंतर बोलतो,’ असे म्हणत कर्नल मनप्रीत सिंह यांनी फोन कट केला. पण, तो त्यांचा कुटुंबीयांसोबतचा शेवटचा फोन कॉल ठरला, असे त्यांच्या मेहुण्यांनी सांगितले.

श्रीनगर : ‘आता एन्काउंटर सुरू आहे, नंतर बोलतो,’ असे म्हणत कर्नल मनप्रीत सिंह यांनी फोन कट केला. पण, तो त्यांचा कुटुंबीयांसोबतचा शेवटचा फोन कॉल ठरला, असे त्यांच्या मेहुण्यांनी सांगितले. बुधवारी अतिरेक्यांबरोबर झालेल्या चकमकीत त्यांच्यासह  आणखी ३ जण शहीद झाले होते. कर्नल मनप्रीत सिंह शहीद झाल्याचे वृत्त त्यांच्या पत्नीलाही देण्यात आले नव्हते, ते केवळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. या सर्व शहिदांच्या घरावर शोककळा पसरली, परंतु ते देशासाठी शहीद झाल्याचे सांगत त्यांनी भावनेपेक्षा कर्तव्यभावना मोठी हे दाखवून दिले.

शहीद झालेले कर्नल मनप्रीत सिंह हे चंडीगडचे रहिवासी होते आणि मेजर आशिष धौनक हे पानिपतचे रहिवासी होते. शहिदांच्या घरी सांत्वनासाठी नागरिकांची रीघ लागली आहे.

दोन दहशतवाद्यांना घेरले : जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी गुरुवारी अनंतनाग जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना घेरले आहे. काश्मीर पोलिसांनी शहिदांना श्रद्धांजली वाहताना सांगितले की, आमचे सैन्य दहशतवाद्यांना घेरण्यात निर्धाराने गुंतले आहे.

तो देशासाठी शहीद,  मी रडणार नाहीमी वीरपुत्राला जन्म दिला होता. माझा मुलगा देशासाठी शहीद झाला. मी त्याला नमन करीन. मी त्याला माझ्या मांडीवर घेईन, मी रडणार नाही. तो आम्हा सातही जणांना रडवत रडवत निघून गेला.    - मनजीत कौर(कर्नल  मनप्रित सिंह यांच्या आई) 

दोन महिन्यांच्या मुलीचे आभाळ हरवले...n दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्यांमध्ये पोलिस उपअधीक्षक हुमायून भट यांचाही समावेश आहे. हुमायून भट यांना दोन महिन्यांची मुलगी आहे. भट यांचे वडील गुलाम हसन भट हे जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे निवृत्त महानिरीक्षक (आयजी) आहेत. n मुलाचा मृतदेह घरी आणण्यात आल्यानंतर गुलाम हसन भट यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यावेळी ते काही वेळ स्तब्ध उभे राहिले. जम्मू-काश्मीरमध्ये पोलिस दलात नोकरी धोक्याची आहे, हे ते स्वत: महानिरीक्षक राहिलेले असल्यामुळे त्यांना चांगलेच माहीत होते.

नवीन घर पाहिलेच नाही...मेजर आशिष हे २ वर्षांच्या मुलीचे वडील होते. त्यांचे कुटुंब सध्या सेक्टर-७ मध्ये भाड्याच्या घरात राहते. त्यांनी टीडीआय सिटीमध्ये आपले नवीन घर बांधले होते. त्यांचे मामा महावीर यांनी सांगितले की, ते ३ दिवसांपूर्वी आशिषशी फोनवर बोलले. २३ ऑक्टोबरला आशिष रजा घेऊन नवीन घर पाहायला येणार होते. मात्र, त्यापूर्वीच ते शहीद झाले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर