शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

"मणिपूर हिंसाचारावर संसदेत बोलू दिलं नाही", भाजपच्या मित्रपक्षाच्या खासदाराचे धक्कादायक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 6:46 PM

लोरहो पफोज यांना कोणी बोलू दिले नाही, असे विचारले असता त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. भाजपचा मित्रपक्ष असल्याने हात बांधले आहेत, असे लोरहो पफोज म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून मणिपूरच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, भाजपचा मित्रपक्ष नागा पीपल्स फ्रंटच्या (NPF) खासदाराने मणिपूर हिंसाचाराबद्दल धक्कादायक विधान केले आहे. पावसाळी अधिवेशनात मणिपूर हिंसाचारावर बोलायचे होते. मात्र वरिष्ठांनी संसदेत बोलण्याची परवानगी दिली नाही. या संपूर्ण प्रकरणावर बोलण्यापासून रोखण्यात आले. आम्ही भाजपचे मित्रपक्ष असलो तरी आपल्या लोकांसाठी बोलण्याचीही जबाबदारी आहे, असे स्पष्ट शब्दांत एनपीएफ खासदार लोरहो पफोज यांनी म्हटले आहे.

दरम्यान, लोरहो पफोज यांना कोणी बोलू दिले नाही, असे विचारले असता त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. भाजपचा मित्रपक्ष असल्याने हात बांधले आहेत, असे लोरहो पफोज म्हणाले. तसेच, भाजपने राज्यात विकास केला आहे, डोंगराळ भागातही चांगले काम केले आहे. पण राज्यात नुकताच झालेला हिंसाचार हाताळण्यात भाजपची चूक झाली आहे, असेही लोरहो पफोज म्हणाले.

याचबरोबर, लोरहो पीफोज यांनी काँग्रेसने नेते राहुल गांधींचे कौतुक केले. ते म्हणाले की, विरोधी पक्षनेते असतानाही राहुल गांधी मणिपूरला पोहोचले. त्यांनी हिंसाग्रस्त लोकांसोबत चर्चा केली. जे योग्य होते आणि परिस्थितीची गरज होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरकडे लक्ष देत नाहीत ही माझ्यासाठी दुःखाची बाब आहे. पंतप्रधानांनी तिथे जाऊन जनतेच्या जखमेवर मलम लावले पाहिजे, असे लोरहो पफोज यांनी म्हटले आहे.

मणिपूर हिंसाचारावरून गेल्या काही दिवसांपासून विरोधक केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूर हिंसाचारामुळेच अविश्वास प्रस्ताव आणला गेला. मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तसेच, मणिपूरमध्ये आग लागली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेत हसणे आणि विनोद करणे, हे अशोभनीय आहे, असे राहुल गांधी यांनी शुक्रवारी म्हटले होते. 

टॅग्स :BJPभाजपाManipur Violenceमणिपूर हिंसाचार