शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

लोकसभेच्या निकालापूर्वीच भाजपाला धक्का, एका मित्रपक्षाने सोडली साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 21:47 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वीच भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे.

इंफाळ - लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस आता अगदी जवळ आला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील काँग्रेसच्या गोटात धडधड वाढली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वीच भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे. पूर्वेत्तर राज्यातील मणिपूरमध्ये भाजपासोबत आघाडीत असलेल्या नागा पीपल्स फ्रंटने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळी नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) ने याची घोषणा केली. याबाबत नागा पीपल्स फ्रंटचे प्रवक्ते अचुमबेमे किकोन यांनी सांगितले की, कोहिमा येथील एनपीएफच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीनंतर मणिपूरमधील भाजपा सरकारला दिलेला पाठिंबा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मणिपूरमध्ये सध्या एन. वीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि मित्रपक्षांचे सरकार सत्तेवर आहे. एनपीएफने पाठिंबा काढून घेतला असला तरी मणिपूरमधील भाजपाची सत्ता स्थिर आहे. 60 सदस्य असलेल्या मणिपूर विधानसभेत भाजपाचे 29 आमदार असून, एलजेपीचा  एक, एआयटीसीचा एक आणि एका अपक्ष आमदाराचा भाजपाला पाठिंबा आहे. एनपीएफच्या चार आमदारांनी पाठिंबा काढून घेण्यापूर्वी विधानसभेत भाजपाला 36 आमदारांचा पाठिंबा होता. 2017 साली झालेल्या मणिपूर विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने 21 जागा जिंकल्या होत्या. मात्र नंतर काँग्रेसच्या 8 आमदारांनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपाचे संख्याबळ 29 वर पोहोचले होते.  

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९