शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

एनआरसी अंमलबजावणीचा निर्णय अद्याप घेतलेला नाही; केंद्र सरकारने केले स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 05:33 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालसह देशभर एनसीआर लागू करण्यात येईल, अशी घोषणा केली होती.

नवी दिल्ली : देशभर राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) सुरू करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे केंद्र सरकारतर्फे, मंगळवारी लोकसभेत सांगण्यात आले.

एनआरसीच्या विरोधात दिल्ली, मुंबई, कोलकातासह देशाच्या अनेक भागांत रोज आंदोलने सुरू असताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. याखेरीज राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) करताना लोकांकडून कोणतीही कागदपत्रे घेण्यात येणार नाहीत आणि आधार देणेही सक्तीचे नसेल, असेही राय यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालसह देशभर एनसीआर लागू करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. तेव्हापासून एनआरसी, एनपीआर व सीएए यांच्याविरोधात देशात आंदोलने सुरू आहेत. दिल्लीच्या शाहीनबागमध्ये गेले ५२ दिवस हजारो महिला ठिय्या आंदोलन करीत आहेत. देशातील २0 विरोधी पक्षांनी केंद्राच्या या तिन्ही निर्णयांच्या विरोधात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती.

केंद्र सरकारच्या या दोन घोषणा म्हणजे माघार असल्याचे मानले जाते. एनआरसी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे का, कधीपर्यंतच्या लोकांना त्यात सामावून घेतले जाईल, त्याला काही राज्यांनी विरोध दर्शवला आहे का, केंद्र सरकारने राज्यांशी चर्चा केली आहे का, या चंदन सिंग व नागेरश्व राव यांच्या प्रश्नाच्या उत्तरात राय म्हणाले की, एनआरसी देशात लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही.

१ एप्रिलपासून नोंदणी

राय यांनी सांगितले की, १ एप्रिलपासून होणाऱ्या लोकसंख्या नोंदणीबाबत राज्यांशी चर्चा सुरू आहे. या नोंदणीच्या वेळी नागरिकांना कोणतीही कागदपत्रे वा पुरावे सादर करावे लागणार नाहीत. आधारचा पुरावा देणेही ऐच्छिक असेल. तसेच नागरिकांनी दिलेल्या माहितीची शहानिशा केली जाणार नाही.

टॅग्स :National Register of CitizensएनआरसीBJPभाजपाIndiaभारत