शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
7
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
8
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
9
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
10
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
11
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
13
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
14
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
15
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
16
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
17
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
18
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
19
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
20
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...

'या' गेम चेन्जर रणनीतीमुळे चीनला घ्यावी लागली माघार, NSA डोवालांच्या नेतृत्वात आखला गेला प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 19:56 IST

सांगण्यात येते, की पेंगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील काठावरील उंच भागांवर कब्जा करण्याची भारताची चाल या संपूर्ण प्रकरणात गेम-चेन्जर ठरली. याची प्लॅनिंग एनएसए अजीत डोवाल (NSA Ajit Doval) यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती. (India china faceoff )

नवी दिल्ली - पेंगाँग सरोवर भागातील उत्तर आणि दक्षिण काठावरुन भारत-चीनचे (India-China) सैन्य मागे हटले आहे. गेली काही महिने सुरु असलेल्या या तणावपूर्ण परिस्थितीत अनेक वेळा दोन्ही देशांचे सैनिक आमने सामने आले. हिंसक झटापटही झाली. मात्र, अखेर दोन्ही देशांच्या सैन्यांत सहमती होऊन  डिसएंगेजमेन्टची प्रक्रियाही सुरु झाली आहे. (NSA Ajit Doval led meet suggested game changer idea to occupy pangong southern bank)

सांगण्यात येते, की पेंगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील काठावरील उंच भागांवर कब्जा करण्याची भारताची चाल या संपूर्ण प्रकरणात गेम-चेन्जर ठरली. याची प्लॅनिंग एनएसए अजीत डोवाल (NSA Ajit Doval) यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती. 

यासंदर्भात इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी सूत्रांनी सांगितले, की चीनसोबतच्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर एनएसए अजीत डोवाल यांच्या नेतृत्वात एक उच्च स्थरीय बैठक झाली. या बैठकीत सीडीएस जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवनेदेखील (manoj naravane) होते. या बैठकीत ऑगस्ट महिन्यात पेंगाँग सरोवराच्या दक्षिण काठावरील रणनीतीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या भागांवर कब्जा करण्यासंदर्भात प्लॅनिंग करण्यात आली.

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

या बैठकीदरम्यान रेजांग ला, रेचन ला, हेल्मेट टॉप आणि अकी ला यांच्यासह दक्षिणेकडील उंचावरील ठिकाणांवर कब्जा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामागचा हेतू चीनला चर्चेच्या प्लॅटफॉर्मवर आणणे असा होता आणि नंतर घडलेही तसेच. यानंतर भारतीय जवानांनी पेंगाँगच्या दक्षिणेकडील उंच टेकड्यांवर कब्जा केला. यामुळे चीन संपूर्ण तणावात बॅकफुटवर राहिला. यामुळे चीनवर प्रचंड दबाव होता. कारण या कब्जामुळे भारत चीनच्या तुलनेत अधिक सरस झाला. 

याशिवाय चीनसोबतच्या तणावादरम्यान हवाईदल प्रमुखही सक्रिय होते. एयर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया हे देखील उत्तरेकडील सीमावर्ती भागांवर चिनी धोक्याचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या तयारीसंदर्भात एनएसएला माहिती देत होते.

अजित डोवाल आपल्या गावी पोहोचले अन् मातृभाषेत संवाद साधून सर्वांचे मन जिंकले...

भारताच्या या अॅक्शनमुळे चीनला स्पष्ट संदेश मिळाला की भारत कुठल्याही प्रकारच्या आक्रमकतेचा सामना करण्यास तयार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच, आमच्यात अनेक बैठका झाल्या आहेत. तसेच एनएसएने दिलेल्या सूचनाही अत्यंत उपयोगी आल्या, असे लष्कर प्रमुखांनी म्हटले होते.

 

टॅग्स :Ajit Dovalअजित डोवालindia china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखBipin Rawatबिपीन रावतmanoj naravaneमनोज नरवणे