शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ओडिशात चक्रीवादळातील बळींची संख्या १६, युद्धस्तरावर मदतकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 06:11 IST

चक्रीवादळ फोनीमुळे ओडिशात किमान १६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोकांना याचा फटका बसला आहे.

भुवनेश्वर - चक्रीवादळ फोनीमुळे ओडिशात किमान १६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोकांना याचा फटका बसला आहे. या वादळाने धडक दिल्याच्या एक दिवसानंतर राज्यात जवळपास १० हजार गावांत आणि शहरी भागात युद्धस्तरावर मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. ४३ वर्षांत झालेल्या तीन मोठ्या वादळांपैकी हे एक आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की, २०० किमी प्रति तास वेगाने आलेल्या वादळामुळे शुक्रवारी पुरीमध्ये जोरदार पाऊस आणि वादळाने हाहाकार माजवला. हे वादळ शांत होईपर्यंत आणि पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करण्यापूर्वी या वादळाच्या तडाख्यात आलेल्या गावांमध्ये अनेक घरांची छपरे उडाली आणि अनेक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.या वादळाने शुक्रवारपर्यंत ८ बळी घेतले होते. मयूरभंज जिल्ह्यासह अन्य भागांत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या वाढून १६ झाली. अनेक भागांतील सविस्तर माहिती येणे अद्याप बाकी आहे. मयूरभंज जिल्ह्याचे आपत्कालीन विभागाचे अधिकारी एस. के. पती यांनी सांगितले की, बारीपदामध्ये वेगवेगळ्या जागी झाडे उन्मळून चार जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी चर्चा केली. मोदी यांनी राज्य सरकारला आश्वासन दिले की, केंद्राकडून राज्याला सर्वोतोपरी मदत दिली जाईल.मोदी उद्या ओडिशात भेट देणारपंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी ओडिशाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. राज्यपाल गणेशलालजी यांच्याशी मोदी यांनी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली.

टॅग्स :Fani Cyclone फनी वादळOdishaओदिशा