शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
3
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
4
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
5
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
6
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
7
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
8
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
9
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
10
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
12
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
13
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
14
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
15
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
16
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
17
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
18
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
19
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
20
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!

नुपूर शर्मा प्रकरण: इस्लामिक देशांची संघटना OICला भारताने सुनावले खडेबोल, त्या आरोपांना दिलं चोख प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 5:35 PM

Nupur Sharma case: नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत केलेल्या टिप्पणीनंतर इस्लामिक देशांमध्ये संतापाची लाट उसळली होती. तसेच इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ओआयसीने भारतावर टीका केली होती. त्याला आता भारत सरकारकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

नवी दिल्ली - नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत केलेल्या टिप्पणीनंतर इस्लामिक देशांमध्ये संतापाची लाट उसळली होती. तसेच इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ओआयसीने भारतावर टीका केली होती. त्याला आता भारत सरकारकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले असून, ओआयसीला खडेबोल सुनावण्यात आले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, भारत ओआयसीच्या सचिवालयाकडून करण्यात आलेल्या अनावश्यक आणि कोत्या मानसिकतेतून केलेल्या टिप्पणीला फेटाळून लावत आहे. तसेच भारत सर्व धर्मांप्रति सर्वोच्च सन्मान ठेवतो, असेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बागची यांनी सांगितले की, काही व्यक्तींनी एका पूजनीय व्यक्तिमत्वाबाबत आक्रमक टिप्पणी आणि ट्विट केली होती. ही टिप्पणी कुठल्याही रूपात भारत सरकारच्या विचारांचे प्रदर्शन करत नाही. त्यांनी सांगितले की, संबंधित संघटनेने या व्यक्तींवर कठोर कारवाई केली आहे.

भाजपाने वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना रविवारी पक्षातून निलंबित केले. तर दिल्ली विभागाचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनाही पक्षातून हाकलण्याचा निर्णय घेतला. दोन्ही नेत्यांच्या वादग्रस्त टिप्पणींबाबत आखाती देशांनी आक्षेप घेत निषेध नोंदवला होता.

या वक्तव्यांवर मुस्लिम समुदायाकडून होत असलेल्या विरोधानंतर भाजपाने या दोन्ही नेत्यांच्या विधानापासून स्वत:ला वेगळे केले. तसेच पक्ष सर्व धर्मांचा आदर करतो, असे सांगितले. दरम्यान, अरिंदम बागची यांनी सांगितले की, ओआयसी सचिवालयाने पुन्हा एकदा विशिष्ट्य हेतून प्रेरित, दिशाभूल करणारी आणि खोडसाळ टिप्पणी केली आहे. ही टिप्पणी निश्चितपणे स्वार्थी तत्त्वांच्या शहावर त्यांच्या फुटिरतावादी अजेंड्याला उघड करते.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी ओआयसीच्या टिप्पणीवर प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना पुढे सांगितले की, आम्ही ओआयसीच्या सचिवालयाला विनंती करतो की, त्यांनी सांप्रदायिक मार्गावर पुढे जाणे बंद करावे. तसेच सर्व धर्म आणि आस्थांबाबत सन्मान ठेवा. ओआयएने मोहम्मद पैगंबरांबाबत झालेल्या टिप्पणीवरून भारतावर टीका केली होती. तसेच भारतामध्ये मुस्लिमांच्या संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली होती.  

टॅग्स :IndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारInternationalआंतरराष्ट्रीय