शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
मराठा तितुका मेळवावा नाही, ओबीसी संपावावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
4
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
5
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
6
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
7
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
8
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
9
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
10
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
11
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
12
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
13
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
14
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
15
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
16
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
17
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
18
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
19
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
20
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा

भाजपा आणि एमआयएम यांच्यात ‘नुरा कुस्ती’

By admin | Published: March 17, 2016 12:38 AM

भाजपा आणि एमआयएम हे दोन्ही पक्ष राजकीय फायदा उकळण्यासाठी आपसात नुरा कुस्ती करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही पक्षांचे आपसात साटेलोटे आहे, अशा शब्दांत

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीभाजपा आणि एमआयएम हे दोन्ही पक्ष राजकीय फायदा उकळण्यासाठी आपसात नुरा कुस्ती करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही पक्षांचे आपसात साटेलोटे आहे, अशा शब्दांत काँग्रेसने बुधवारी ‘वंदेमातरम्’ आणि ‘भारत माता की जय’वरून या दोन्ही पक्षांवर शरसंधान केले.‘वंदेमातरम्’ किंवा ‘भारत माता की जय’ म्हटले पाहिजे असे भारतीय राज्यघटना किंवा अन्य कोणत्याही नियमावलीत लिहिलेले नाही. परंतु हा नारा स्वातंत्र्य लढ्यादरम्यान मनाच्या अभिव्यक्तीच्या रूपात पुढे आला होता. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात देशाप्रति सन्मान आणि समर्पण भाव व्यक्त करण्यासाठी ‘वंदेमातरम्’ किंवा ‘भारत माता की जय’ हे नारे बुलंद करण्यात आले, असे काँग्रेसचे प्रवक्ते मनु अभिषेक सिंघवी यांनी म्हटले आहे. ‘कुणी माझ्या मानेवर सुरी ठेवली तरी मी भारत माता की जय म्हणणार नाही’, असे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी एका सभेत म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून निर्माण झालेले वादळ शमताना दिसत नाही. लेखक आणि खासदार जावेद अख्तर यांनी मंगळवारी ‘भारत माता की जय’ म्हणत ओवैसी यांना प्र त्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. ‘कुणाच्या सांगण्यावरून नारा देऊन मला माझी देशभक्ती सिद्ध करावी लागेल काय? असे केलेच पाहिजे हे कोणत्या कायद्यात लिहिले आहे? मी खासदार आहे, मी संविधानाची शपथ घेतलेली आहे आणि मी संसदेत हजर राहतो. मी संविधानाच्या व्यवस्थेशी बांधील आहे. तरी आमच्या देशभक्तीबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे,’ असे ओवैसी म्हणाले होते.पं. जवाहरलाल नेहरू यांच्या ‘डिस्कव्हरी आॅफ इंडिया’ या पुस्तकाचा उल्लेख करताना सिंघवी म्हणाले, या देशाचे लोक, वृक्ष, जंगल, पर्वत, नद्या हे सर्वच भारत माता आहेत. कारण याच धरतीवर हे सर्वकाही विद्यमान आहे. हा देशासाठी समर्पित नारा आहे आणि त्याचा उच्चार करण्यात वाईट काही नाही. उलट हा नारा बुलंद करताना आम्हाला अभिमान वाटतो. परंतु ओवैसी, गिरिराज सिंग, साक्षी महाराज, आजम खान आणि शफिक-उ-रहमान यांच्यासारखे लोक मात्र केवळ ध्रुवीकरणासाठी आणि राजकीय फायदा उकळण्यासाठी एकमेकांच्या हातात हात घालून द्वेष पसरविण्याचे काम करीत आले आहेत.समाज विभाजन करण्याचा प्रयत्ननिवडणुका जवळ आल्या की हे लोक समाज तोडण्याच्या आपल्या कारवायांना गती देतात. महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत याचा अनुभव आला आहे आणि आता पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी येथील निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुका पाहूनच भाजपा आणि एमआयएमने एकत्र येऊन ध्रुवीकरण करण्याच्या उद्देशाने समाजाचे विभाजन करण्याचा प्रयत्न चालविला आहे, असा आरोप सिंघवी यांनी केला.