शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
2
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
3
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
4
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
5
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
6
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
7
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
8
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या
9
"आम्हाला सांगण्याऐवजी तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करा"; भारताने बांगलादेशला सुनावले
10
IPL 2025: भाई... हा नशेत आहे का?; अर्जुन तेंडुलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
11
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
12
Shani Dev: शनिशिंगणापुरला शनि मंदिराचा चौथरा आहे पण छप्पर नाही; असे का? जाणून घ्या कारण...
13
IPL 2025: रोहित शर्माचा धमाका! Mumbai Indiansमधून 'असा' विक्रम करणारा केवळ दुसराच
14
IPL 2025 : MS धोनीच्या CSK संघात बदल! MI च्या संघातून खेळलेल्या 'बेबी एबी'वर खेळला मोठा डाव
15
Astro Tips:थाटामाटात लग्न करून वर्षभरात होणारे घटस्फोट थांबवण्यासाठी 'हे' मुद्दे वेळीच लक्षात घ्या!
16
“हिंदू, हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा BJPचा अजेंडा, भाषेची सक्ती रद्द करा”: हर्षवर्धन सपकाळ
17
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
18
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
19
IPL ची आजच झाली होती सुरुवात! फक्त ४ क्रिकेटपटू खेळू शकलेत सर्व १८ सीझन, पाहा यादी
20
Sant Dnyaneshwaranchi Muktai Review : मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली..., जाणून घ्या कसा आहे 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'

"स्टेशनवर खूप गर्दी, मी घरी परत येतेय..."; नर्सचा मुलाला शेवटचा फोन अन् चेंगराचेंगरीत गेला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 19:27 IST

रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत महावीर एन्क्लेव्ह पार्ट १ येथील रहिवासी असलेल्या नर्स पूनम यांचा मृत्यू झाला.

नवी दिल्लीरेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत महावीर एन्क्लेव्ह पार्ट १ येथील रहिवासी असलेल्या नर्स पूनम यांचा मृत्यू झाला. पूनम दोन मैत्रिणींसोबत प्रयागराजसाठी निघाल्या होत्या. पण स्टेशनवर अचानक झालेल्या चेंगराचेंगरीमुळे त्यांचा जीव गेला. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे आणि ते सरकारकडे न्याय आणि मदतीची याचना करत आहेत.

कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम आणि त्यांच्या मैत्रिणींचं ट्रेनचं रिजर्व्हेशन नव्हतं. त्या रात्री प्रयागराजला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी नवी दिल्लीरेल्वे स्टेशनवर पोहोचल्या होत्या. पहिली ट्रेन रात्री ८ वाजता चुकली, त्यानंतर रात्री ९ वाजताची ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत होत्या. याच दरम्यान पूनम यांनी मुलाशी फोनवर संपर्क साधला आणि त्याला सांगितलं की, स्टेशनवर खूप गर्दी आहे आणि त्या घरी परतण्याचा विचार करत आहेत.

यानंतर पूनम यांचा फोन बंद झाला आणि काही वेळाने कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. रात्रीच्या वेळी स्टेशनवर चेंगराचेंगरी झाल्याची बातमी आली आणि त्यात अनेक लोक जखमी झाले. जेव्हा पूनमशी संपर्क होऊ शकला नाही, तेव्हा तिचा पती वीरेंद्र आणि मुलगा अक्षित रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत अनेक रुग्णालयांमध्ये जाऊन त्यांचा शोध घेत होते. 

कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं आहे की, ते आरएमएल हॉस्पिटल, लेडी हार्डिंग हॉस्पिटल, रेल्वे हॉस्पिटल आणि इतर अनेक ठिकाणी गेले. पण पूनम कुठेही सापडल्या नाहीत. रुग्णालय प्रशासनाकडूनही त्यांना कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नव्हती आणि ते रात्रभर फिरत राहिले. अखेर, त्यांना माहिती मिळाली की पूनम यांचा मृत्यू चेंगराचेंगरीत झाला आहे.

पूनम यांचे ​​पती वीरेंद्र यांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा अक्षित रात्रभर त्याच्या आईचा शोध घेत होता पण त्याला योग्य माहिती देण्यासाठी कोणीही नव्हतं. प्रशासनाने योग्य वेळी माहिती दिली असती तर कदाचित त्यांच्या समस्या कमी झाल्या असत्या असं कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं आहे. आता कुटुंब सरकारकडे मदतीची याचना करत आहे आणि घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करत आहे. चेंगराचेंगरीमागील खरी कारणं शोधून काढावीत आणि दोषींवर कारवाई करावी अशी त्यांची इच्छा आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीrailwayरेल्वेPrayagrajप्रयागराजKumbh Melaकुंभ मेळा