शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
2
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
4
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
5
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
6
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
7
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
8
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
9
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
11
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
12
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
13
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
14
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
15
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
16
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
17
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
18
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
19
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
20
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या

मानवी हस्तक्षेपामुळे महासागर धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 5:32 AM

महासागर दिनानिमित्त खास मुलाखत : शास्त्रज्ञ डॉ. एम.आर. रमेशकुमार यांचे मत

राजू नायक

पणजी : पृथ्वीचा ७१ टक्के भाग महासागरांनी व्यापलेला असून, या ग्रहावरील ९७ टक्के पाणी या महासागरात सापडते. यातले एकतृतीयांश द्रवरूपात, तर उर्वरित दोनतृतीयांश हिमनग आणि धृवीय हिमावरणाच्या रूपात असते. या महासागरांचे पृथ्वीतलासाठी आणि भारतासाठी काय महत्त्व आहे, हे जाणून घेण्यासाठी दोनापावला- गोवा येथील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेतले शासत्रज्ञ डॉ. एम.आर. रमेशकुमार यांच्याशी वार्तालाप केला, त्याचा हा गोषवारा.

महासागराची उपयुक्तता कशी विशद कराल?महासागरांचे अस्तित्व भूपृष्ठीय पर्यावरणासाठी अनन्यसाधारण मानले गेलेय. आपल्या देशाला मान्सूनच्या पावसाचे वरदान लाभलेय. येथे येणाऱ्या प्रत्येक मान्सूनची तीन वैशिष्ट्ये आहेत. त्याचे केरळच्या किनाºयावरील आगमन, पर्जन्यकाळातील वृष्टीचे आरोह- अवरोह आणि पावसाचे देशभरातील विविध प्रमाणात पडणे. या सगळ्यांवर महासागरांतील घडामोडींचा प्रभाव असतो.महासागरांना मानवी व्यवहारांपासून कोणते धोके संभवतात?समुद्राच्या पाण्याचे ८० टक्के प्रदूषण जमिनीवरील मानवी व्यवहारांतून होत असते.ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्रगर्भातल्या प्रक्रिया बदलत असून, पाण्याच्या तापमानवाढीमुळे अनेक प्रजातींसमोर अस्तित्वाचे संकट उभे राहिले आहे.या समस्यांचे समाधान काय?समुद्री जैववैविध्याच्या रक्षणासाठी मरीन पार्क्स स्थापन करणे, ट्रॉलिंगसारख्या विघातक मासेमारीच्या पद्धती बंद करणे, देवमाशांच्या जिवावर उठलेल्या नौदलांच्या सोलार यंत्रणेचा वापर कमी करणे, पारंपरिक मत्स्यव्यावसायिकांना उत्तेजन देत संवर्धनाच्या कार्यक्रमात सामावून घेणे, हे तातडीचे उपाय आहेत.आपल्या महासागरांना असलेले अन्य धोके कोणते?वातावरण बदल हा महत्त्वाचा व फार मोठा धोका. त्यामुळे पाणी तापू लागले असून, त्यातील आम्लाचे प्रमाण वाढते आहे. यामुळे पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊन समुद्री जिवांना श्वास घेताना त्रास होतो. दुसरा धोका आहे, तो प्लास्टिक प्रदूषणाचा.संरक्षित समुद्रीक्षेत्राची कल्पना स्पष्ट कराल का?जशी आपल्याकडे अभयारण्ये असतात आणि त्यांच्या माध्यमातून आपण प्राण्यांच्या प्रजातींचे रक्षण करतो तद्वतच आपण समुद्रसपाटीखाली संरक्षित समुद्रक्षेत्र तयार करायचे असते. तेथे मत्स्यजीवनाला अभय असते.समुद्रगर्भात खनिजेही असतात का?हो तर! खोल समुद्रात मँगनिजचे साठे आहेत. त्यातील तांबे, निकेल आणि कोबाल्टचे लक्षणीय प्रमाण या साठ्यांना अमूल्य बनवते. मँगनिजचे गोळे जेमतेम १० सेंटीमीटर आकाराचे असतात आणि त्यांचा आकार १ ते ३ मिलीमीटरने वाढण्यास तब्बल १० लाख वर्षे लागतात.समुद्रातील जैववैविध्याविषयी सांगाल?असे मानतात की आजपर्यंत आपण बॅक्टेरिअल प्लँकटनविषयी जेमतेम ०.१ % माहिती प्राप्त केली आहे. एका अंदाजानुसार समुद्राच्या पोटात पाच लाख ते एक कोटी प्रजातींचे वास्तव्य असावे.या जैववैविध्याला कोणते धोके संभवतात?सर्वाधिक धोका आहे, तो प्रवाळांना. प्रवाळ समुद्रांच्या आम्लीकरणाबाबतीत अत्यंत संवेदनशील असतात. ग्लोबल वॉर्मिंगमुळे प्राणवायूची मात्रा कमी झाल्यावर आम्लाची मात्रा वाढते. शिवाय पाण्याचे तापमानही वाढते. या सर्व प्रक्रियांमुळे आज ६० टक्के प्रवाळांसमोर अस्तित्वाचे संकट उभे राहिले आहे. हे प्रमाण २०३० पर्यंत ९० टक्क्यांवर जाणार असून, २०५० पर्यंत १०० टक्के प्रवाळ नामशेष होऊ शकतात. दुसरा धोका आहे तो कांदळवनांना. २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या ९ अब्जांचा टप्पा ओलांडणार असल्याने हा ताण किती वाढेल याची कल्पनाच करवत नाही.जागतिक महासागर दिनाचे महत्त्व काय?१९९२ साली कॅनडात झालेल्या महासागरविषयक शिखर परिषदेत ८ जून महासागर दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला. त्याला २००८ साली संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता मिळाली. यंदाच्या जागतिक महासागर दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे ‘स्वयंपोषक महासागरासाठी कल्पकतेचा वापर.’

टॅग्स :Sea Routeसागरी महामार्गWaterपाणी