शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनोज जरांगेंनी २८८ जागांवर उमेदवार उभे करावेत, आम्ही स्वागतच करू”; लक्ष्मण हाकेंचे आव्हान
2
टोलमाफी, २ नदीजोड प्रकल्पांना मंजुरीसह राज्य मंत्रिमंडळाने घेतले १९ मोठे निर्णय
3
अजितदादांच्या आमदाराचा पारा चढला; महायुतीतील मित्रपक्षाच्या नेत्यांनाच इशारा
4
"या कामाची पोचपावती जनता निवडणुकीत देईल"; टोलमाफीच्या निर्णयावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
5
PAK vs ENG : शाहीनला मोठा झटका! PCB ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता आफ्रिदीची लक्षवेधी पोस्ट
6
Surbhi Chandna : "रोज रात्री रडायची..."; १३ वर्षे डेट केल्यावर अभिनेत्रीला लग्न केल्याचा पश्चाताप, झाली भावुक
7
२०१९ नंतर पहिल्यांदाच एका दिवसात Dmart च्या शेअरमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांना कसली भीती?
8
बाबा सिद्दिकीच नाही तर या नेत्यांच्या हत्यांनीही हादरली होती मुंबई, समोर आला होता अंडरवर्ल्डचा हात
9
“CMपदाच्या चेहऱ्यापेक्षा महाभ्रष्ट महायुती सरकार घालवणे महत्त्वाचे”: बाळासाहेब थोरात
10
Rohit Sharma Hardik Pandya, Mumbai Indians IPL 2025: हार्दिक पांड्या, रोहित शर्मा अन् मुंबई इंडियन्स... जयवर्धने हेड कोच होताच आकाश चोप्राची मोठी भविष्यवाणी
11
जेव्हा करीनाने बहिणीला पहिल्यांदा सांगितलं होतं सैफबद्दल, तेव्हा करिश्माने दिली होती ही रिअ‍ॅक्शन
12
Kojagiri Purnima 2024: कोजागरी विशेष 'हे' लक्ष्मी मंत्र; करतील कर्जमुक्त; वाचा हे विशेष तोडगे!
13
Raj Thackeray reaction, Toll Free in Mumbai: "सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
14
Kojagiri Purnima 2024: कोजागरी पौर्णिमेला का खेळला जातो महाभोंडला? हा केवळ खेळ आहे की पुजा? वाचा!
15
इमर्जिंग आशिया चषकासाठी Team India ची घोषणा; तिलककडे नेतृत्व, ऋतुराज गायकवाडला डच्चू
16
'या' योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना करू शकतं १५ लाखांची मदत; जाणून घ्या अर्ज कसा करावा?
17
प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती'ची कळी खुलेना? ३ दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
18
कोल्हापूर दौरा, अचानक समोर तालमीतला मित्र दिसला, मोहोळांनी गाडी थांबवून गळाभेट घेतली...
19
Reliance Jio नं लाँच केले २ नवे रिचार्ज प्लॅन्स; केवळ १ रुपयाचा फरक, कोणता आहे बेस्ट? 
20
स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी! वडील सुरेश कुसाळेंच्या नाराजीनंतर मोठी घोषणा

Odisha Railway Accident: मला माझ्या भावाशी बोलू द्या... शेवटची इच्छा पूर्ण होताच ट्रेनमध्ये अडकलेल्या तरुणानं सोडले प्राण   

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2023 5:03 PM

Odisha Railway Accident: कदाचित आपल्याकडे शेवटची काही मिनिटेच शिल्लक आहेत, याची जाणीव त्याला झाली. त्यामुळेच त्याने बचाव पथकातील व्यक्तीला छोट्या भावाशी संपर्क साधून देण्याची विनंती केली.

ओदिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात जवळपास २८० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आता या अपघातादरम्याच्या करुण कहाण्या जगासमोर येत आहेत. अपघातग्रस्त कोरोमंडल एक्स्प्रेसमधून ललित ऋषिदेव नावाचा तरुणही प्रवाक करत होता. जेव्हा तो ट्रेनमध्ये चढला तेव्हा हा त्याचा शेवटचा प्रवास आहे, याची त्याला कल्पनाही नव्हती. बिहारमधील पुर्णिया येथे राहणाऱ्या ललितला चेन्नईमध्ये मजुरीचं काम मिळालं होतं.

ललित हा नोकरीसाठी घरातून बाहेर पडला. पण तो चेन्नईला पोहोचू शकला नाही. वाटेतच त्याला मृत्यूने गाठले. ओदिशामधील बालासोर येथे झालेल्या अपघातामध्ये ललित गंभीर जखमी झाला होता. जेव्हा त्याला वाचवण्यासाठी बचाव पथक त्याच्यापर्यंत पोहोचले, तेव्हा त्याची प्रकृती चिंताजनक होती. कदाचित आपल्याकडे शेवटची काही मिनिटेच शिल्लक आहेत, याची जाणीव त्याला झाली. त्यामुळेच त्याने बचाव पथकातील व्यक्तीला छोट्या भावाशी संपर्क साधून देण्याची विनंती केली.

तेव्हा बचाव पथकातील व्यक्तींनी मोबाईल शोधण्यास सुरुवात केली. लवकरच ललितचा मोबाईल सापडला. त्यानंतर त्याचा भाऊ मिथुन ऋषिदेव याला फोन लावण्यात आला. फोनवर ललितने काही मिनिटे त्याच्यासोबत संवाद साधला. त्यानंतर ललितचा मृत्यू झाला. भावाचा अचानक मृत्यू झाल्याने मिथुनलाही शोक अनावर झाला. कुटुंबातील इतर व्यक्तींनाही मोठा धक्का बसला.

दरम्यान, ललिचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्याचे कुटुंबीय बालासोरमध्ये पोहोचले. तेव्हा ललितचा मृतदेह शोधण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. खूप शोधाशोध केल्यानंतर ललितचा मृतदेह सापडला. मुलाचा मृतदेह पाहून आई-वडील बेशुद्ध झाले. दरम्यान, ललितसोबत आणखी तिघेजण होते. मात्र त्यातील दोन जणांचा या रेल्वे अपघातात मृत्यू झाला.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघातFamilyपरिवार