शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
2
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
3
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
4
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
5
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
6
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
7
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
8
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
9
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
10
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
11
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
12
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
13
'लकी गर्ल'! भर रस्त्यात Rohit Sharma नं दिला चाहतीच्या हातात हात; अन्... VIDEO
14
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
15
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
16
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
17
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
18
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
19
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
20
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा

Odisha Train Accident : ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताचे कारण काय? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2023 9:21 AM

ओडिशा रेल्वे दुर्घटनेत स्थानिक दलांव्यतिरिक्त लष्कर आणि हवाई दलही बचावकार्यात काम करत आहेत.

काल सायंकाळी सात वाजता ओडिशा येथे रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत २३७ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ९०० हून अधिकजण जखमी झाले. या अपघातात बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक दलांव्यतिरिक्त लष्कर आणि हवाई दलही बचाव कार्यात आहेत. जखमींना हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढले जात आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव शनिवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या भीषण रेल्वे अपघातामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.

Railway Accident : ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा वाढला; २०७ जणांचा मृत्यू, ९०० हून अधिक प्रवासी जखमी

ओडिशातील बालासोर भागात झालेल्या भीषण रेल्वे अपघातात शुक्रवारी रात्रीपासून बचावकार्य सुरू आहे. दोन पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडी यांच्यात झालेल्या भीषण टक्करनंतर १० हून अधिक बोगी रुळावरून घसरल्या. या भीषण अपघातातील मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. या अपघातात २८० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ९०० हून अधिक जखमी झाले आहेत. स्थानिक पोलीस, प्रशासनासह एनडीआरएफ आणि लष्कराचे जवान रात्रीपासून मदतकार्य करत आहेत. 

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव शनिवारी सकाळी बचावकार्याची माहिती घेतली. यावेळी अश्विनी वैष्णव म्हणाले, अपघातातील जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई जाहीर करण्यात आल्याचे सांगितले. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे मंत्रालय, केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या स्तरावर जखमींना सर्वतोपरी मदत करत आहेत.

या भीषण रेल्वे अपघाताचे कारण काय, असा प्रश्न रेल्वेमंत्र्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, हे अद्याप स्पष्ट झाले नसून, रेल्वे मंत्रालयाने याप्रकरणी चौकशी समिती स्थापन केली आहे. समिती संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. या अपघातात जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही. आपण स्वतः या प्रकरणाच्या तळाशी जाणार असून निकाल लागेपर्यंत गप्प बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातrailwayरेल्वेAccidentअपघातOdishaओदिशा