शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

अपघाताचं टायमिंग संशयास्पद, हा घातपात असण्याची शक्यता, माजी रेल्वेमंत्र्यांनी केली चौकशीची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2023 4:18 PM

Odisha Train Accident: ओदिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे देशभरात शोकाचं वातावरण आहे. या अपघातात आतापर्यंत २८० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी या अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे.

ओदिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे देशभरात शोकाचं वातावरण आहे. या अपघातात आतापर्यंत २८० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी या अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे. हा अपघात म्हजणे कटकारस्थान असू शकतो, त्यामुळे या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे, या अपघाताचं टायमिंग विचित्र आहे. या अपघाताचं विश्लेषण करण्याची गरज आहे, असे दिनेश त्रिवेदी म्हणाले.

माजी रेल्वेमंत्री त्रिवेदी यांनी सांगितले की, मी जे दृष्य पाहिलं, त्यातून आपण भूकंपानंतरचं दृश्य पाहतोय, असं वाटत होतं. जपानप्रमाणे दुर्घटनांमध्ये एकही मृत्यू होता कामा नये, हे आमचं लक्ष्य असलं पाहिजे. नवं तंत्रज्ञान येत आहे. त्याला रेल्वेच्या सिस्टिममध्ये दाखल करून घेतलं जात आहे.

त्रिवेदी यांनी पुढे सांगितले की, पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे २०१० मध्य एक मोठा रेल्वे अपघात झाला होता. या अपघातानंतर दहा वर्षांपर्यंत तिथे रेल्वे चालली नव्हती. या घटनेमध्ये गीतांजली एक्स्प्रेस आणि एका मालगाडीचा अपघात झाला होता. त्यात सुमारे १५० ते १८० जणांचा मृत्यू झाला होता. २०१० मध्य एका तपास आयोगाने या अपघाताचा उल्लेख मोठी दुर्घटना म्हणून केला होता.

ओदिशामधील बालासोर येथे झालेल्या या अपघातामध्ये आतापर्यंत २८० जणांचा मृत्यू झाला आहे. लष्कर, हवाई दलासह अनेक पथके बचाव मोहिमेत गुंतलेली आहे. ट्रेनच्या डब्यांमध्ये अजूनही काही लोक अडकलेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ट्रेनच्या डब्यांमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू, बाटल्या, चपला आदी वस्तू विखुरलेल्या होत्या. मदत कार्यामध्ये लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे. तक दुसरीकडे मृतांच्या संख्येमध्येही सातत्याने वाढ होत आहे. अपघातग्रस्त डब्यांमध्ये एमर्जंन्सी अलार्म अजूनही वाजत आहे. तसेच अपघातग्रस्त डब्यांमध्ये अनेक लोक अडकलेले असल्याची शक्यता आहे. 

टॅग्स :AccidentअपघातIndian Railwayभारतीय रेल्वेOdishaओदिशा