शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

स्वत:च्या फायद्यासाठी पदाचा दुरुपयोग केला नाही

By admin | Published: May 27, 2015 11:49 PM

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार गैरमुद्यांकडे लोकांचे लक्ष वळविण्यासाठी भ्रष्टाचाराचा राग आळवत आहे.

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार गैरमुद्यांकडे लोकांचे लक्ष वळविण्यासाठी भ्रष्टाचाराचा राग आळवत आहे. आपण कधीही स्वत:च्या, कुटुंबाच्या किंवा मित्र परिवाराच्या फायद्यासाठी पदाचा दुरुपयोग केलेला नाही, अशा शब्दांत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी बुधवारी मोदी सरकारवर तोफ डागली.मोदी सरकारच्या काळात लोकशाही संस्था धोक्यात आहे आणि जलद आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्याच्या नावावर आता कल्याणकारी राज्याची संकल्पनाच पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात येत आहे, असा स्पष्ट आरोप मनमोहनसिंग यांनी केला. ते नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात बोलत होते. २ जी लायसेन्सप्रकरणी सहकार्य न केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी मनमोहनसिंग यांनी आपल्याला दिली होती, असा आरोप ‘ट्राय’चे माजी अध्यक्ष प्रदीप बैजल यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. या पार्श्वभूमीवर मनमोहनसिंग यांनी हे वक्तव्य केले.संपुआच्या कार्यक्रमांना नव्या रूपात सादर केले जात आहे आणि हा भाजप सरकारने घेतलेला पुढाकार असल्याचे मार्केटिंग करण्यात येत आहे, असा स्पष्ट आरोप मनमोहनसिंग यांनी केला. दरम्यान, डॉ. मनमोहनसिंग हे कळसूत्री बाहुले आहेत आणि ते उजळ माथ्याने खोटे बोलत आहेत, अशी बोचरी टीका भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)४संपुआ सरकारवर लावण्यात आलेला ‘धोरण लकव्या’चा आरोप फेटाळताना मनमोहनसिंग पुढे म्हणाले, माझ्या सरकारने सत्ता सोडली त्यावेळी भारत जगात सर्वाधिक वेगाने विकास पावणारी अर्थव्यवस्था होती. परंतु विद्यमान सरकारअंतर्गत अर्थव्यवस्था खिळखिळी होत चालली आहे. ४अतिशय पक्षपाती आणि सांप्रदायिक विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी भूतकाळाचे सातत्याने पुनर्लेखन केले जात आहे. असंतोष दडपला जात आहे.