शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

Farmer Protest: गावी सोडलेले आजोबा परत आले, राकेश टिकैतनी खांद्यावर मारले अन् निघाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 15:36 IST

Farmer Protest: कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन गेल्या ७० दिवसांपासून सुरु आहे. दिल्ली-युपीच्या गाझीपूर सीमेवर याचे केंद्र बनले आहे. 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर आता देशभराच्या नजरा भारतीय किसान युनियनच्या राकेश टिकैत यांच्यावर लागलेल्या आहेत.

कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन गेल्या ७० दिवसांपासून सुरु आहे. दिल्ली-युपीच्या गाझीपूर सीमेवर याचे केंद्र बनले आहे. 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर आता देशभराच्या नजरा भारतीय किसान युनियनच्या राकेश टिकैत यांच्यावर लागलेल्या आहेत. येत्या 6 जानेवारीला म्हणजे उद्या देशभर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहेत. (Farmer Protest continue for 70 days, on Saterday farmers called chakka jam in country.)

या पार्श्वभूमीवर आज आंदोलनस्थळी एक वेगळेच दृष्य दिसले. आंदोलनाच्या ठिकाणी एका वयोवृद्ध शेतकऱ्याला राकेश टिकैत यांनी त्यांच्या खांद्यावर मारले होते. टिकैत यांनी सांगितले की, वृद्ध शेतकऱ्यांनी त्यांच्या गावातूनच आम्हाला समर्थन द्यावे. या आजोबांना आम्ही त्यांच्या गावी सोडलेले, मात्र ते पुन्हा आंदोलनात भाग घेण्यासाठी आले आहेत. उद्याचा चक्का जाम हा केवळ गावांमध्ये होणार आहे. दिल्लीमध्ये य़ाचा काहीच फरक दिसणार नाही. आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुर आहे. याद्वारे पुढे सरकारशी चर्चा केली जाईल. इथे गेल्या 70 दिवसांपासून शेतकरी आंदोलक बसले आहेत. चर्चा देखील झडत आहेत. इथे बसणारे सर्वच चुकीचे आहेत का, असा सवालही टिकैत यांनी विचारला आहे. 

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलेल्या आरोपांवर टिकैत यांनी समाचार घेतला. सरकारकडून कोणत्या नेत्यावर लावलेल्या आरोपांवर कमतरता राहिलीय का? आज शेतकरी निम्म्या किंमतीत त्यांचे उत्पादन विकतात, हेच चुकीचे आहे का, असे ते म्हणाले. 

शुक्रवारी राज्यसभेमध्ये कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काँग्रेस रक्ताची शेती करत असल्याचा आरोप केला होता. यावर टिकैत यांनी विरोधकांचे तर तेच सांगू शकतात, मी राज्यसभेतील चर्चा पाहिली नाही. शेतकरी शनिवारी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत दिल्लीसोडून देशभरात चक्का जाम आंदोलन करणार आहेत. 

'रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते, भाजपा नाही', केंद्रीय कृषीमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

तोमर काय म्हणाले...

नव्या कृषी कायद्यांना विरोध फक्त एका राज्यापुरता मर्यादित आहे. शेतकऱ्यांना भडकवले जात आहे. शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांना नव्या कृषी कायद्यांमधील एक त्रृटी दाखवण्यास अपयश आले आहे, असे नरेंद्रसिंह तोमर म्हणाले. तसेच, शेतकरी आंदोलनाबाबत कांग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना संपूर्ण जगाला माहिती आहे की, पाण्यानेच शेती होते. रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते. भाजपा रक्ताने शेती करू शकत नाही, असे सांगत नरेंद्रसिंह तोमर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीNarendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमरcongressकाँग्रेस