शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

“तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही? मोदी सरकारने स्पष्ट करावे”: ओमर अब्दुल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 19:52 IST

तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही, हे केंद्रातील मोदी सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे.

जम्मू:तालिबाननेअफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून तेथील परिस्थिती बिकट होत चालली आहे. तालिबान सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असून, इराणच्या धर्तीवर सरकार बनवणार असल्याचे सांगितले जात आहे. तालिबानच्या या सरकारला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळते का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. भारत सरकार तालिबानशी आमने-सामने चर्चा करणार असल्याचे बोलले जात असून, एकूण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही, हे केंद्रातील मोदी सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे. (omar abdullah said modi govt should clear about whether taliban is terrorist group or not)

केंद्रातील मोदी सरकार म्हणजे सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’; काँग्रेसचा घणाघात

अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानचा भारतावर काय परिणाम होईल, असा प्रश्न सामान्यांना पडला असताना, यावर प्रतिक्रिया देताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, तालिबानचा जम्मू-काश्मीरवर काय परिणाम होईल, याबाबत केंद्रातील मोदी सरकारला विचारायला हवे. तसेच तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही, हेही मोदी सरकारने स्पष्ट करायला हवे, अशी मागणी ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे.

PM मोदी आणि योगी आदित्यनाथ म्हणजे ‘रब ने बना दी जोडी’; राजनाथ सिंहांची स्तुतिसुमने

अनुच्छेद ३७०  पुन्हा लागू करण्यासाठी संघर्ष करणार

अलकायदाबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार देत ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होण्यापूर्वी राज्याचा दर्जा आणि अनुच्छेद ३७० पुन्हा लागू करण्याचा पुनरुच्चार करत, यासाठी संघर्ष करत राहणार असल्याचे ओमर अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले. जम्मू-काश्मीर निवडणुकांमध्ये ५० जागा मिळवण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे, यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, सन २०१४ मध्ये भाजपने ४४ जागा जिंकू असे म्हटले होते. ते पूर्ण झाले नाही. भाजपने आधी ४० जागा जिंकून दाखवाव्यात, असा टोला ओमर अब्दुल्ला यांनी लगावला आहे. 

घे भरारी! देशाच्या अर्थव्यवस्थेची विक्रमी कामगिरी; पहिल्या तिमाहीत २०.१ टक्के नोंदवला GDP

बँक खाती उघडण्याची परवानगी द्यायला हवी

तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही, हे आधी स्पष्ट करायला हवे. तालिबान दहशतवादी संघटना असेल, तर आपण त्यांच्याशी चर्चा का करतोय आणि जर तालिबान दहशतवादी संघटना नाही, तर त्यांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद्यांच्या यादीतून बाहेर ठेवायला हवे. त्यांना बँक खाती उघडण्याची अनुमती द्यायला हवी. आताच्या घडीला भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे भारताने यावर ठोस भूमिका घ्यायला हवी, असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.   

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरOmar Abdullahउमर अब्दुल्लाCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी