शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

एकाच दिवशी उघडली दीड कोटी बँक खाती

By admin | Published: August 29, 2014 2:40 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक अस्पृश्यता संपविण्याचा नारा देत महत्त्वाकांक्षी आर्थिक समावेशन मिशन ‘जन-धन योजनेचा’ शुभारंभ केला

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक अस्पृश्यता संपविण्याचा नारा देत महत्त्वाकांक्षी आर्थिक समावेशन मिशन ‘जन-धन योजनेचा’ शुभारंभ केला. या योजनेंतर्गत सर्व गरिबांना बँक खाती पुरविली जातील. उद्घाटनाच्या दिवशी गुरुवारी देशभरात १.५ कोटी खाती उघडण्याचा विक्रम नोंदला गेला. बहुदा जगभरात कधीही एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात बँक खाती उघडली गेली नसावी. सरकार स्थापन झाल्यानंतर १०० दिवसांत नवी योजना आणताना मोदी म्हणाले की, २६ जानेवारी २०१५ पर्यंत या योजनेंतर्गत ७.५ कोटी लोकांना सामावून घेतले जातील. त्यांना रुपे- डेबिट कार्डवर शून्य रुपये जमा असतानाही बँक खाते दिले जाईल. त्यांना १ लाख रुपयांचा अपघाती विमा आणि ३० हजार रुपयांचा आयुर्विमाही दिला जाईल. नंतर त्यांना ५ हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट देण्याची सुविधा असेल.यूएसएसडी प्लॅटफॉर्म...मोदींनी बेसिक जीएसएम मोबाईल फोनच्या माध्यमातून बँकिंग सेवा उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय एकीकृत ‘यूएसएसडी प्लॅटफॉर्म’ देशाला समर्पित केला. आपण सर्वांनी मिळून लढा दिला तर गरिबीपासून मुक्ती मिळेल. देशाचा प्रत्येक नागरिक अर्थव्यवस्थेला जोडला गेला तरच गरिबीचा नायनाट करता येईल. सरकार आणि सरकारी संपत्ती गरिबांसाठीच आहे. देशातील ४० टक्के लोक आर्थिक अस्पृश्यतेचे शिकार बनले आहेत,असेही मोदी म्हणाले.सावकारी पाशातून सोडवणार...श्रीमंत आणि उद्योगपतींना कमी दरात कर्ज मिळते, मात्र गरिबांना पाचपेक्षा जास्त पटीने सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते. एखादी व्यक्ती एकदा का सावकाराच्या पाशात अडकली की आयुष्यभर बाहेर पडणे अशक्य होते. या स्थितीमुळे अशा लोकांवर आत्महत्येची वेळ येते असेही मोदींनी म्हटले.देश आर्थिक महाशक्ती बनेल- राजनाथसिंहचीन आणि अमेरिकेच्या बरोबरीने भारत जगात आर्थिक महाशक्ती बनेल, असा विश्वास केंद्रिय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी ‘जनधन’ योजनेचा लखनौ येथे प्रारंभ करताना व्यक्त केला. सरकारने ज्या पद्धतीने योजना सुरू केल्या ते पाहता जगातील तीन आर्थिक महासत्तांमध्ये भारताचा समावेश होईल, असा मला विश्वास आहे. या योजनेमुळे जनतेत ओळख मिळाल्याची भावना बळावेल आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवता येईल, असेही ते म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)