शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

रस्ते अपघातांत दरवर्षी दीड लाख लोकांचा मृत्यू

By admin | Published: December 04, 2015 2:55 AM

दरवर्षी देशभरात पाच लाख रस्ते अपघातांमध्ये सुमारे दीड लाख लोकांचा मृत्यू होतो, अशी माहिती केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत गुरुवारी दिली.

नवी दिल्ली : दरवर्षी देशभरात पाच लाख रस्ते अपघातांमध्ये सुमारे दीड लाख लोकांचा मृत्यू होतो, अशी माहिती केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत गुरुवारी दिली. मोठ्या संख्येतील अपघातांमुळे दरवर्षी ५५ हजार कोटी रुपयांचे नुकसान होत असून ही रक्कम सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या(जीडीपी) तीन टक्के एवढी आहे.१२ व्या पंचवार्षिक योजनेत महामार्गांच्या विकासासाठी एकूण ४,८३,००० कोटी रुपयांची गरज असून सुमारे १,७८,००० कोटी रुपयांचा निधी खासगी गुंतवणुकीतून उभारण्याची योजना आहे. ९५ टक्के महामार्ग प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंबंधी प्रश्न सोडविण्यात आले असून लवकरच काम सुरू होईल. प्रलंबित पाच टक्के प्रकल्पांची कामेही सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मनरेगाच्या रकमेचे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरणपुढील वर्षी १ जानेवारीपासून मनरेगाच्या निधीचे हस्तांतरण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जाईल. केरळमधून नव्या पद्धतीचा प्रारंभ केला जाणार आहे. योग्य लाभार्र्थींपर्यंत पैसा पोहोचविला जावा हा त्यामागचा उद्देश असल्याचे ग्रामीण विकास मंत्री वीरेंद्र सिंग यांनी सांगितले. मनरेगांतर्गत सुमारे ११ कोटी कामगारांच्या खात्यांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी ६५ टक्के खाती बँकांची तर उर्वरित पोस्ट खात्यांची आहेत. बनावट कामगार आणि नोंदणीकृत कामगारांच्या यादींचा गैरवापर टाळण्यासाठी ‘ई-मस्टर’ यंत्रणा आणण्यात आली आहे. यावर्षी १ एप्रिलपासून इलेक्ट्रॉनिक निधी व्यवस्थापन यंत्रणा लागू करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)