शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

दीड लाख टपाल कार्यालये टीसीएसने केली आधुनिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 06:37 IST

इंटिग्रेटेड ईआरपी सोल्युशनच्या माध्यमातून अत्यंत दूरवरील भागाशी संपर्क

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी माहिती व तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) देशातील १.५ लाख टपाल कार्यालयांच्या (इंडिया पोस्ट) आधुनिकीकरणासाठी इंटिग्रेटेड सोल्युशन तैनात केले आहे. २०१३ मध्ये टीसीएसने टपाल विभागाकडून १,१०० कोटी रुपयांचा अनेक वर्षे चालणारा करार माहिती व तंत्रज्ञान आधुनिकीकरणासाठी मिळवल्याचे जाहीर केले होते.हे आधुनिकीकरण टीसीएस इतर कोणत्याही कंपनीकडून सेवा न घेता झाले आहे. या भागीदारीचा हेतू पोस्टाला अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त करून ग्राहकांना कार्यक्षम सेवा देण्याचा आहे. या रूपांतरणात कोअर सिस्टीम इंटिग्रेशन कार्यक्रम टीसीएसने डिझाईन करून राबवला आहे. यात इंटिग्रेटेड ईआरपी सोल्युशन आहे. त्याद्वारे मेल ऑपरेशन्स, फायनान्स आणि अकाऊंटिंग, एचआर फंक्शन्स करता येतील व दीड लाखांपेक्षा जास्त संख्येत असलेल्या टपाल कार्यालयांना प्रचंड नेटवर्कशी जोडले गेले. यामुळे ही टपालसेवा सर्वात मोठी ई-पोस्टल नेटवर्क असलेली बनेल, असे टीसीएसने निवेदनात म्हटले.टीसीएसने म्हटले आहे की, आम्ही आमच्या पॉइंट ऑफ सोल्युशनची (पीओएस) अंमलबजावणी २४ हजार टपाल कार्यालयांत ८० हजार पीओएस टर्मिनलने केली असून, कन्साईनमेंट ट्रॅकिंग कॅपॅबिलिटीजने वेब पोर्टलही तसेच मल्टी लिंग्वल कॉल सेंटर ग्राहकांसाठी उभारले आहेत. या रूपांतरणाचा महत्त्वाचा हेतू हा देशभर पसरलेल्या टपाल कार्यालयाचा उपयोग आर्थिक व्यवहारात लोकांना सामावून घेणे आणि अतिशय दूरच्या भागांत सेवा पोहोचवण्याचा आहे. हे काम १.३ लाख दर्पण १ उपकरणाद्वारे केले जाईल. हे उपकरण हातात मावणारे असून, ग्रामीण डाक सेवक ते टपाल, बँकिंग, विमा सेवा आणि अत्यंत दूरवरील खेड्यांत रोख देण्यासाठी करतील व यासाठी नेटवर्क कनेक्टिव्हिटीची गरज नसेल, असे टीसीएसने म्हटले.इंटिग्रेटेड सोल्युशनला पाच लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची गरज आहे, एकाच वेळी ४० हजार वापरकर्त्यांना सेवा मिळतील आणि तीन दशलक्ष टपाल व्यवहारांची प्रक्रिया केली जाईल व त्याद्वारे ही जगातील एक मोठी सॅप (एसएपी) राबवणारी ठरेल, असेही त्यात म्हटले आहे.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस