शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

अमरनाथ यात्रेसाठी एक लाख सुरक्षा जवान; सुरक्षा दलांच्या २५० कंपनी मागविल्या, सुरक्षाधिकाऱ्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 13:44 IST

भाविकांच्या सुरक्षेचा महत्त्वाचा मुद्दा यंदाही ऐरणीवर आला आहे. सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नसून, एक लाखावर जवान तैनात करण्यात येणार आहेत, असे सुरक्षाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सुरेश एस. डुग्गर -

जम्मू : संपूर्ण जगभरातून भाविक येत असलेल्या अमरनाथ यात्रेला अद्याप ३ महिन्यांचा कालावधी असला तरी तयारीने वेग घेतला आहे. यंदा भाविकांच्या सुरक्षेसाठी एक लाख सुरक्षा जवान तैनात करण्यात येणार आहेत.

भाविकांच्या सुरक्षेचा महत्त्वाचा मुद्दा यंदाही ऐरणीवर आला आहे. सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नसून, एक लाखावर जवान तैनात करण्यात येणार आहेत, असे सुरक्षाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अधिकृतरीत्या सुरक्षा दलांच्या २५० कंपनी सुरक्षेसाठी मागविण्यात आल्या आहेत. यात सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान असतील. लष्कर व राज्य पोलिस जवानांना अतिरिक्तरीत्या तैनात करण्यात येणार आहे.

यंदा ३ जुलै ते ९ ऑगस्ट यात्राअमरनाथ श्राईन बोर्डच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी अमरनाथ यात्रेत खूपच गर्दी होण्याची शक्यता आहे.तीन जुलैपासून सुरू होणारी अमरनाथ यात्रा नऊ ऑगस्ट म्हणजेच श्रावण पौर्णिमेपर्यंत चालेल.यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या निश्चित करण्यात आलेली नाही. सहभागी होणाऱ्यांना उत्तम प्रकृती असण्याशिवाय कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. १० लाखांपेक्षा अधिक लोकांना सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आलेले आहे.

 

टॅग्स :Amarnath Yatraअमरनाथ यात्राSoldierसैनिक