शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

एक साधू चढला मोबाइल टॉवरवर, दुसऱ्याने पेटवून घेतले; नेमकं काय आहे प्रकरण..?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 2:50 PM

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात गेल्या 550 दिवसांपासून साधूंचे आंदोलन सुरू आहे.

भरतपूर:राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील भगवान कृष्णाचे क्रीडांगण असलेल्या आदिबाद्री परिसरात अवैध खाणकाम थांबवण्याची मागणी करत बाबा हरिबोल दास मंगळवारी मोबाईल टॉवरवर चढले. 24 तास उलटूनही बाबा हरिबोल दास टॉवरवरुन उतरले नाहीत. सरकारने या भागातील खाणकाम बंद करून ते वनक्षेत्र घोषित करावे, अशी त्यांची अट आहे. या मागणीबाबत बाबा हरिबोल दास यांनी दोन दिवसांपूर्वी आत्मदहनाचा इशाराही दिला होता. 

550 दिवसांपासून आंदोलन त्यांच्या इशाऱ्यानंत राजस्थान सरकारचे कॅबिनेट मंत्री विश्वेंद्र सिंह त्यांचे मन वळवण्यासाठी आले होते. साधू आणि मंत्री यांच्यात संवाद झाला, मात्र त्यावर बाबा हरिबोल दास यांचे समाधान झाले नाही आणि ते मंगळवारी मोबाईल टॉवरवर चढले. आदिबद्री भागातील खाणकाम बंद करण्याच्या मागणीसाठी गेल्या 550 दिवसांपासून साधूंचे आंदोलन सुरू आहे. मात्र आजपर्यंत यावर तोडगा निघालेला नाही.

एका साधूने स्वतःला पेटवून घेतलेदरम्यान, याप्रकरणी ठिय्या आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी एका साधूने ज्वलनशील पदार्थ ओतून स्वतःला पेटवून घेतले. यामुळे ते गंभीर भाजले. त्यांना गंभीर अवस्थेत प्रशासनाने डीईजी रुग्णालयात दाखल केले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे आता पोलीस प्रशासनात घबराट पसरली आहे. साधू आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. पळसोपा गावात साधू-संतांचे हे आंदोलन सुरू आहे.

या परिक्रमा मार्गात श्रीकृष्णाची अनेक मंदिरे ज्या भागात अवैध उत्खनन होत आहे, तो परिसर गोवर्धन परिक्रमा मार्गाचा परिसर आहे. हा परिसर भगवान श्रीकृष्णाचे क्रीडांगण मानला जातो. हा उत्तर प्रदेशातील मथुरेजवळ आहे. गोवर्धन पर्वताच्या या परिक्रमा मार्गात भगवान श्रीकृष्णाशी संबंधित अनेक मंदिरे आहेत कृष्णाच्या या भूमीला वाचवण्यासाठी साधू संत अनेक वर्षांपासून झटत आहेत, मात्र त्यांचे ऐकले जात नाही. आता हे प्रकरण बाबा हरिबोल दास टॉवरवर चढल्यामुळे सोशल मीडियातही चर्चेत आले आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीagitationआंदोलन