शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

एकीकडे 'व्होटभक्ती'चं राजकारण तर दुसरीकडे देशभक्ती - पंतप्रधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 14:41 IST

जवानांनी सरकारकडे पाकिस्तानात घुसण्याची परवानगी मागितली ती दिली नाही असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली

पटणा - देशात एकीकडे व्होटभक्तीचं राजकारण होत आहे तर दुसरीकडे देशभक्ती सुरु आहे. 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची आठवण करा, त्यावेळी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी काय केलं होतं? जवानांनी सरकारकडे पाकिस्तानात घुसण्याची परवानगी मागितली ती दिली नाही असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.  बिहारच्या अररियामध्ये झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधानांनी लोकांना संबोधित केले. 

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 26 नोव्हेंबरला मुंबईत दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर भारतीय जवानांनी केंद्र सरकारकडे पाकिस्तानात घुसून बदला घेण्याची परवानगी मागितली. मात्र भारतीय जवानांना परवानगी नाकारण्यात आली. कारण काँग्रेसला मतांचे राजकारण करायचं होतं. सर्वांना माहित होतं की, ते दहशतवादी पाकिस्तानचे आहेत. मात्र काँग्रेसने पाकिस्तानला शिक्षा देण्याऐवजी हिंदू लोकांना हिंदू दहशतवादी शब्द लावण्याचं षडयंत्र केलं असा आरोप पंतप्रधानांनी केला. 

आम्ही दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारलं, दहशतवाद्यांना मारलं म्हणून काँग्रेस नेत्यांच्या पोटात दुखू लागलं. पश्चिम बंगालमध्ये घेतलेल्या सभेतही नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना सांगितले की जर तुम्हाला पुरावे हवे असतील तर पहिलं चीटफंड घोटाळा आणि घुसखोरी करणाऱ्यांचे पुरावे शोधा. सैनिकांच्या धाडसाचे पुरावे मागणं बंद करा असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला. 

एवढ्या उन्हातही इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्व उपस्थित झालात. तुमची तपस्या मी वाया जावू देणार नाही. त्याचा परतावा मी व्याजासह तुम्हाला परत देणार असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. तसेच ज्यांना भारत मातेची अडचण होते असे लोक भारत तेरे तुकडे होंगे नारे लावणाऱ्यांच्या मागे जातात. असे लोक देशाच्या सेवेसाठी कशाला पुढे येणार? असा सवाल त्यांनी उपस्थित करत कन्हैयाकुमारवर टीका केली. 

देशभक्तीचं राजकारण काय असतं हे तुम्ही उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर काय होतं हे बघितलं. भारताने दहशतवाद्यांना घरात घुसून मारलं आणि पाकिस्तानचं तोंड बंद केलं. मात्र दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईवर आनंद व्यक्त करण्याऐवजी काँग्रेस नेते शोक व्यक्त करत आहेत असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाararia-pcअररियाBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019