शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

दिल्लीत एक हजार सशस्त्र पोलीस तैनात- गृहमंत्री अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 02:02 IST

आमदार - पोलिसांत समन्वय साधणार; शांतता समित्यांची गरज

नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हजार सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले असून, आंतरराज्य सीमारेषेवर लक्ष ठेवले जात असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले.दिल्लीच्या ईशान्य भागात सोमवारी सुरू झालेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतर शहा यांच्या उपस्थितीत नायब राज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पोलीस आयुक्त अमूल्य पटनाईक यांच्यात उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी गृहमंत्रालयाचे सचिव अजय भल्ला, काँग्रेस नेते सुभाष चोप्रा, भाजपचे मनोज तिवारी, रामवीर बिदुडी, दिल्ली विधानसभेतील सर्व आमदार उपस्थित होते. पोलीस आणि आमदारांमध्ये समन्वय साधून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले. त्याचप्रमाणे समजातील सर्व घटकांचा समावेश असलेल्या शांतता समित्या स्थापन करण्याची गरज असल्याचेही शहा म्हणाले.हिंसाचार झालेल्या भागात पोलीस कर्मचाऱ्यासह ९ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांच्या सीमारेषांवर लक्ष ठेवले जात आहे. वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांनी सर्वेतोपरी प्रयत्न केले. गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, हिंसाचार सुरू असताना अफवा रोखण्याचे सर्वांत मोठे आव्हान आहे. दिल्लीकर आणि प्रसारमाध्यमांनी अफवा रोखण्यासाठी दक्ष राहणे आवश्यक आहे.शांततेची सुनिश्चिती करा : अमित शहास्थानिक प्रतिनिधींनी तातडीने संवेदनशील भागांत बैठका घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावे, असे आवाहनही शहा यांनी केले आहे.सर्वांनी राजकारण बाजूला ठेऊन या परिस्थितीत एकत्र येण्याची गरज आहे. नेत्यांनी प्रक्षोभक भाषण करू नये, असे आवाहनही शहा यांनी केले आहे.हिंसाचाराविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी एकी दाखवल्याने शहा यांनी हे सकारात्मक चित्र असल्याचे म्हटले आहे.सर्वपक्षीयांनी शांततेसाठी प्रयत्न करावेत आणि हिंसाग्रस्त भागात परिस्थिती नियंत्रणात असल्याची निश्चिती करावी, असेही शहा म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शहा