शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता लाखो लोकांना मिळणार थेट फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 16:54 IST

विधेयक मंजूर झाल्यास रेल्वेची क्षमता वाढेल, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

नवी दिल्ली : रेल्वेच्या जनरल डब्यातून किंवा बोगीतून प्रवास करणाऱ्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी भारतीय रेल्वेने तयारी केली आहे. दरम्यान, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत 1905 च्या भारतीय रेल्वे बोर्ड कायद्याला 1989 च्या रेल्वे कायद्याशी एकीकृत करण्याच्या तरतुदीसह एक विधेयक सादर केले. तसेच, हे विधेयक मंजूर झाल्यास रेल्वेची क्षमता वाढेल, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

अश्विनी वैष्णव यांनी 'रेल्वे दुरुस्ती विधेयक 2024' चर्चेसाठी आणि पारित करण्यासाठी सभागृहात मांडले. ते म्हणाले की,  सुरुवातीला रेल्वे सार्वजनिक बांधकाम विभागचा एक भाग होता आणि 1905 मध्ये ते सार्वजनिक बांधकाम विभागापासून वेगळे करण्यात आले आणि नवीन रेल्वे बोर्ड स्थापन करण्यात आले. 1989 मध्ये नवीन रेल्वे कायदा कायदा करण्यात आला होता, परंतु 1905 च्या रेल्वे बोर्ड कायद्याचा त्यात समावेश करण्यात आलेला नाही, जो त्याच वेळी व्हायला हवा होता.

सध्या सादर करण्यात आलेले हे विधेयक फक्त भारतीय रेल्वे बोर्ड कायदा 1905 ला रेल्वे कायदा 1989 मध्ये एकीकृत करण्यासाठी आणले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास रेल्वेची क्षमता आणि विकास वाढेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली रेल्वेने गेल्या 10 वर्षांत खूप विकास केला आहे. तसेच, गरीब प्रवाशांसाठी या महिन्याच्या अखेरीस रेल्वे गाड्यांमध्ये एक हजार सामान्य डबे जोडले जातील. तर एकूण 10 हजार नवीन डबे जोडण्याचा उपक्रम आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

याचबरोबर, मोदी सरकारच्या काळात रेल्वेचे बजेट वाढले आहे. रेल्वेचे विद्युतीकरण वाढले आहे आणि त्याचे नेटवर्कही वेगाने विस्तारत आहे. तसेच, मोदी सरकारने रेल्वेच्या सुरक्षेकडेही लक्ष दिले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे यूपीए सरकारच्या काळात एका वर्षात सरासरी 153 रेल्वे अपघात होत होते, तर गेल्या वर्षी 40 रेल्वे अपघात समोर आले आणि या वर्षी आतापर्यंत 29 रेल्वे अपघातांची नोंद झाली आहे. रेल्वे अपघात आणखी कमी करण्याकडे लक्ष दिले जात आहेत, असेही अश्विनी वैष्णव यांनी सांगितली.

टॅग्स :railwayरेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव