शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

राष्ट्रीयकृत बँकाची केवळ ३० कोटी कर्जवाटप जिल्हाधिकार्‍यांची नाराजी : पुनर्गठनाची मागणी करणार्‍या शेतकर्‍यांच्या अर्जाचा विचार करा

By admin | Published: May 17, 2016 1:04 AM

जळगाव- शासनातर्फे शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. जिल्हा बँकेने आतापर्यंत ५७० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले असताना राष्ट्रीयकृत बँकानी केवळ ३०.७८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी सोमवारी संध्याकाळी घेतलेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली.

जळगाव- शासनातर्फे शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. जिल्हा बँकेने आतापर्यंत ५७० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले असताना राष्ट्रीयकृत बँकानी केवळ ३०.७८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी सोमवारी संध्याकाळी घेतलेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी सोमवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सोमवारी संध्याकाळी ५ वाजता जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, जिल्हा उपनिबंधक संजय राऊत, लीड बँकेचे प्रतिनिधी मराठे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी पीक कर्ज वाटप तसेच पुनर्गठनाबाबतचा आढावा घेतला. राष्ट्रीयकृत बँकातर्फे केवळ ३० कोटी ७८ लाखांचे पीक कर्ज वाटप झाल्याची माहिती मराठे यांनी दिली. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा बँकेने आतापर्यंत ५७० कोटी पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी किती शेतकर्‍यांचे अर्ज आले त्याबाबत आढावा घेतला. शेतकर्‍यांनी पीक कर्ज पुनर्गठनाचे अर्ज दिल्यास त्या अर्जावर कार्यवाही करावी अशी सूचना त्यांनी यावेळी दिली.
२४ रोजी पुन्हा बैठक
राष्ट्रीयकृत बँकांची अत्यल्प कर्ज वाटप झाल्याने त्याला वेग देण्यासाठी २४ मे रोजी पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीला बँकांचे प्रतिनिधी तसेच व्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत.