शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
3
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
4
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
5
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
6
Suraj Chavan : "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा
7
Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार
8
आधी बुमराहचा धाक! मग आकाश दीपनं 'स्टंप तोड' गोलंदाजीसह सोडली छाप (VIDEO)
9
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
10
एक गुंठ्यात घर कसे बांधावे? सुंदर प्रशस्त डिझाईन, शेजारी-पाहुणे पाहतच राहतील...
11
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
12
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
13
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
14
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
15
IIFL Share Price Today : 'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
16
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
17
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
18
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
19
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
20
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे सुनावणीसाठी फक्त ५ ते ६ मिनिटांचा वेळ

By admin | Published: April 07, 2016 12:34 PM

खटल्यांची वाढती संख्या, न्यायाधीशांची कमतरता आणि निकालाला लागणारा वर्षानुवर्षांचा विलंब या आव्हानांचा भारतीय न्यायव्यवस्था आज सामना करत आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ७ - खटल्यांची वाढती संख्या, न्यायाधीशांची कमतरता आणि निकालाला लागणारा वर्षानुवर्षांचा विलंब या आव्हानांचा भारतीय न्यायव्यवस्था आज सामना करत आहे. न्यायाव्यवस्थेच्या या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच न्यायाधीशांवरील कामकाजाच्या दबावाचा अभ्यास करण्यात आला. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

 
उच्च न्यायालयातील न्यायाधीशाला एका खटल्याच्या सुनावणीसाठी सरासरी पाच मिनिटांपेक्षा कमी वेळ देता येतो. काही न्यायाधीशांना वेळ मिळतो तेव्हा १५ ते १६ मिनिट एका खटल्याच्या सुनावणीसाठी देता येतात. एखाद्या खटल्याबद्दल निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पाच ते सहा मिनिटांचा वेळ मिळतो.  बंगळुरु स्थित दक्षा या स्वंयसेवी संस्थेच्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. 
 
कोलकाता उच्च न्यायालयाचे उदहारण घेतले तर, तिथे न्यायाधीशासमोर एका दिवसात १६३ प्रकरणे सुनावणीसाठी असली तर त्याला प्रत्येक खटल्याच्या सुनावणीसाठी दोन मिनिटांचा वेळ मिळतो. पाटणा, हैदराबाद, झारखंड, राजस्थान या राज्यातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना प्रत्येक खटल्याच्या सुनावणीसाठी दोन ते तीन मिनिटांचा वेळ मिळतो. 
 
अलहाबाद, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि ओरिसामधील न्यायाधीश चार ते सहा मिनिटे देतात. जानेवारी २०१५ पासून देशातील २१ उच्च न्यायालयातील १९ लाख खटल्यांचा अभ्यास करुन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 
 
एक एप्रिल २०१६ पर्यंत उच्च न्यायालयात ५९४ आणि सर्वोच्च न्यायालयात २५ न्यायाधीश आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत न्यायाधीशांचे प्रमाण कमी आहे. अखिल भारतीय न्यायाधीश संघटनेच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने २१ मार्च २००२ रोजी दहालाख भारतीयांमागे कमीत कमीत ५० न्यायाधीश असले पाहिजेत असे निर्देश दिले होते. २०११ च्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार दहा लाख भारतीयांमागे १६.८ न्यायाधीश आहेत.