शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

२७पैकी ९ टक्केच हिंदू बांगलादेशात शिल्लक! उर्वरित गेले कुठे? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 9:56 AM

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) हा लाखो निर्वासितांना न्याय देण्यासाठी आहे. कुणाचेही नागरिकत्व हिरावून घेण्याची तरतूद या कायद्यात नसल्याची हमी गृहमंत्री अमित शाह यांनी अल्पसंख्याकांना यावेळी दिली.

अहमदाबाद : फाळणीच्या वेळी बांगलादेशात २७ टक्के हिंदू होते. आता केवळ ९ टक्के आहेत. उर्वरित गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी, एक तर या हिंदूंचे बळजबरी धर्मांतर केले गेले किंवा आश्रयासाठी त्यांनी भारतात धाव घेतली असल्याचे येथे रविवारी एका कार्यक्रमात बोलताना नमूद केले.

काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या तुष्टीकरणाच्या धाेरणामुळे देशात माेठ्या संख्येने असलेल्या निर्वासितांना वर्षानुवर्षे नागरिकत्वाचा हक्क मिळू शकला नाही, अशी टीका त्यांनी केली.

 नागरिकत्व हिरावून घेणार नाहीनागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) हा लाखो निर्वासितांना न्याय देण्यासाठी आहे. कुणाचेही नागरिकत्व हिरावून घेण्याची तरतूद या कायद्यात नसल्याची हमी गृहमंत्री अमित शाह यांनी अल्पसंख्याकांना यावेळी दिली.

न्यायाच्या प्रतीक्षेत...शेजारी देशांत केवळ हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख आहेत म्हणून अनेकांचा छळ होत राहिला आणि भारतात लाखो-कोट्यवधी लोक तीन पिढ्यांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत राहिले. घुसखोरांना पूर्वीच्या सरकारांनी नागरिकत्व बहाल केले; परंतु हक्क मागणाऱ्यांना तो नाकारण्यात आला, असे शाह म्हणाले.

कायदा काय आहे?२०१४ मध्ये भाजपने नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्याचे आश्वासन दिले होते़. त्यानुसार २०१९ मध्ये त्या आश्वासनाची पूर्ती करण्यात आली. यामुळे कोट्यवधी हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख लोकांना न्याय मिळाला. हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे, नागरिकत्व काढून घेण्याची तरतूदच या कायद्यात नाही.

टॅग्स :Amit Shahअमित शाह