शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
5
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
6
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
7
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
8
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
9
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
10
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
11
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
12
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
13
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
15
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
17
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
18
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
19
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
20
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...

जातीयवाद थांबेल तेव्हाच विकास शक्य - मोदी

By admin | Published: June 13, 2016 7:07 PM

देशातील जातीयवाद थांबेल तेव्हाच देशाचा खरा विकास होईल असे मत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले ते इलाहाबादमधील सभेत बोलत होते.

ऑनलाइन लोकमत

इलाहाबाद, दि. १३ : देशातील जातीयवाद थांबेल तेव्हाच देशाचा खरा विकास होईल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते इलाहाबादमधील सभेत बोलत होते. विकाससाची नवी परिभाषा घेउन सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने केलेल्या २ वर्षाच्या कामकाजाचा आढावाच मोदी यांनी जाहीर सभेत दिला. भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणीची २ दिवसीय बैठक संपल्यानंतर आज इलाहाबादमध्ये रॅलीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना त्यांनी उत्तरप्रदेशच्या जनतेच आभार मानले. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता, भाजपाने आपल्या प्रचारची सुरवातच केली असे म्हणावे लागेल. 
 

(कुठे छत्रपती शिवाजी महाराज नी कुठे गांधी घराणे - पंतप्रधान मोदींचा नाव न घेता वार)

पुढे बोलताना ते म्हणाले, देशाच्या प्रत्येक कानाकोप-यात भाजपला समर्थन मिळत असून, केंद्र सरकारमध्ये उत्तर प्रदेशचा दबदबा आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री उत्तर प्रदेशमधलेचं असल्यानं उत्तर प्रदेशचा विकास निश्चत आहे, उत्तर प्रदेशमध्येही आसामसारखा बदल घडला पाहिजे, असंही ते म्हणाले. या सभेला लालकृष्ण आडवाडी, अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरीसह अनेक भाजपाच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. 

(प्रवाहासोबत वाहत जाण्यासाठी नव्हे; दिशा देण्यासाठी राजकारणात - अमित शहा)

मोदी यांच्या भाषणाती महत्वाचे मुद्दे - 
 
युरीया साठी शेतकऱ्यांना रात्रभर वाट पाहवी लागत होती, कधीकधी त्यांच्यावर लाठी हल्लाही होत होता. स्वातंत्र्यानंतर आमच्या सरकारच्या काळात सर्वात जास्त युरीया निर्मिती करण्यात आली आहे.
 
उत्तर प्रदेशात बीएसी आणि एसपी एकमेकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप करतात परंतु सत्तेत आल्यानंतर कारवाई करीत नाही.
 
उत्तर प्रदेश भ्रष्टाचाराचे आगार बनले असे सांगून नरेंद्र मोदी यांची मुलायम-मायावती यांच्यावर टीका.
 
स्वातंत्र्यानंतर आमच्या सरकारच्या काळात विज निर्मिती करण्याच काम झालं आहे.
 
स्वातंत्र्यानंतर आम्ही शेतकऱ्यांसाठी विमा योजना आमलात आणली.
 
उत्तर प्रदेशमधील १५२९ गावात स्वतंत्र्यानंतरही विज नव्हती, १३५३ गावामध्ये आम्ही २ वर्षात विज उपल्ब्ध करुन दिली आहे. 
सर्वात जास्त पंतप्रधान उत्तरप्रदेशने दिले 
 
ज्या राज्यात आम्हाला सत्ता मिळाली त्या राज्यांचा आम्ही विकास केला आहे, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि गोव्याचा विकास पहा.
आम्ही प्रत्येक क्षेत्रात चागंल काम केलं आहे. 
 
आम्हाला ५ वर्ष सत्ता द्या, यामध्ये आम्ही आपलं कोणतही नुकसान केलं तर आम्हाला लाथ मारुन बाहेर काढा.
 
भारत माता की जय बोलत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.