शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
4
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
5
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
6
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
7
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
8
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
9
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
10
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
13
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
14
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
15
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
16
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
17
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
18
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

पाकिस्तानने कारवाई केली तरच, चर्चा - अजित डोवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2016 8:14 AM

पाकिस्तानने अतिरेक्यांवर कारवाई केली नाही तर, भारत-पाकिस्तानमध्ये परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा रद्द होऊ शकते असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सोमवारी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ११ - पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ल्याचा कट आखणा-या सूत्रधारांवर पाकिस्तानने कारवाई केली नाही तर, भारत-पाकिस्तानमध्ये परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा रद्द होऊ शकते असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सोमवारी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. 
पाकिस्तानने कारवाई केली तरच, भारत चर्चा करेल असे डोवाल यांनी स्पष्ट केले. १५ जानेवारीला भारत-पाकिस्तानमध्ये परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा होणार आहे. 
मागच्या आठवडयात भारताने, पाकिस्तानला कारवाई करण्यायोग्य पुरावे दिले असून, आता चेंडू पाकिस्तानच्या कोर्टात असल्याचे स्पष्ट केले होते. आज सकाळी दैनिक भास्कर वर्तमानपत्राने भारत-पाकिस्तानमध्ये परराष्ट्र सचिव स्तरावरची चर्चा रद्द झाल्याचे वृत्त दिले होते. 
डोवाल यांच्या मुलाखतीच्या आधारे दैनिक भास्करने हा दावा केला होता. हे वृत्त प्रसारीत झाल्यानंतर काहीवेळाने भारताने पाकिस्तानसोबत परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा रद्द केल्याचे वृत्त चुकीचे असून, आपण अशी कोणतीही मुलाखत दैनिक भास्करला दिली नसल्याचा खुलासा केला डोवाल यांनी केला होता.