शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

सरकारी कार्यक्रमात फक्त शाकाहारी जेवण; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 5:38 AM

आसाम सरकारने विकासावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. 

गुवाहाटी : व्हीआयपी संस्कृती आसाम सरकार संपुष्टात आणणार आहे. यापुढे सरकारी कार्यक्रमात केवळ शाकाहारी व सात्विक खाद्यपदार्थच दिले जातील, असे त्या राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोमवारी जाहीर केले. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत.

त्यांनी सांगितले की, एखाद्या जिल्ह्यात मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांचा दौरा असेल तिथे सरकारी कार्यक्रमात फक्त शाकाहारी खाद्यपदार्थच दिले जातील. हे कार्यक्रमदेखील साध्या पद्धतीने आयोजित करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. 

‘सरकारी इमारतींच्या बांधकामावर लक्ष ठेवा’

सरमा म्हणाले की, जिल्ह्यातील सरकारी इमारतींचे बांधकाम किती पूर्ण झाले, याची पाहणी करावी. आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी केंद्र या गोष्टींतून विकासाला चालना मिळते. त्यामुळे त्या गोष्टींकडेही जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.

नियमातून पाहुण्यांना वगळले

सरकारी कार्यक्रमात शाकाहारी खाद्यपदार्थ किंवा जेवण देणे यापुढे बंधनकारक करण्यात येणार आहे. मात्र सरकारने कार्यक्रम, दौऱ्यासाठी आमंत्रित केलेल्या पाहुण्यांना मात्र हा नियम लागू होणार नाही असे बिस्वा सरमा यांनी सांगितले. आसाम सरकारने विकासावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. 

ताफ्यामध्ये दहापेक्षा जास्त कार नकोत...

मुख्यमंत्र्यांचा एखाद्या जिल्ह्यात दौरा असेल त्यावेळी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्या कारसह ताफ्यामध्ये दहापेक्षा जास्त कार नसाव्यात, असा आदेश हिमंता बिस्वा सरमा यांनी दिला. गेल्या महिन्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित असलेल्या मंत्र्यांसाठी एका जिल्हाधिकाऱ्याने शाही भोजनव्यवस्था केली होती. त्यामुळे या अधिकाऱ्याला मुख्यमंत्री सरमा यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर या जिल्हाधिकाऱ्याला एक पत्र लिहून सरमा यांनी त्यांचे कान टोचले. बैठकीत शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्याच्या वारंवार सूचना देऊनही त्याचे पालन करण्यात आले नाही, असे त्यांनी या पत्रात म्हटले होते.

 

टॅग्स :Assamआसाम