शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

झारखंडमध्ये ऑपरेशन लोटस? काही आमदार रायपूरमध्ये, राजकीय हालचालींना वेग, आमदारांसाठी दोन दिवसांचे बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 7:11 AM

Operation Lotus: झारखंडमध्ये लाभाचे पद प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द होण्याच्या शक्यतेने महाआघाडीच्या आमदारांमध्ये फूट पडण्याची भीती सतावते आहे.

- एस. पी. सिन्हारांची : झारखंडमध्ये लाभाचे पद प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द होण्याच्या शक्यतेने महाआघाडीच्या आमदारांमध्ये फूट पडण्याची भीती सतावते आहे. महाराष्ट्रात अलीकडेच शिवसेनेत झालेल्या फुटीपासून धडा घेऊन महाआघाडीच्या आमदारांना काँग्रेसशासित छत्तीसगढमध्ये नेण्यात आले आहे. रायपूरमध्ये जाणाऱ्यांमध्ये यूपीएच्या अनेक आमदारांचा समावेश आहे. तथापि, या आमदारांबरोबर मुख्यमंत्री हेमंत सोरेन तसेच झामुमोचे काही आमदार गेलेले नाहीत.

यूपीएच्या ३२ आमदारांसह ३५ नेते रांची विमानतळावरून विशेष विमानाने रायपूरकडे रवाना झाले. यात सत्ताधारी झामुमोचे १९, काँग्रेसचे १२ व राजदच्या एका आमदाराचा समावेश आहे. याबरोबरच काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे, प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर व संतोष पांडेय यांचाही त्यात समावेश आहे. महाआघाडीत कोणत्याही प्रकारची फूट पडू नये, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. 

रायपूरमध्ये मेफेअर गोल्ड रिसॉर्टमध्ये आमदारांसाठी दोन दिवसांचे बुकिंग करण्यात आले आहे. हॉटेलला हाय सिक्युरिटी झोन जाहीर करण्यात आले आहे. तेथे एक डीएसपी व दोन पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. तथापि, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सध्या रांचीमध्येच राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्याबाबत गुरुवारच्या कॅबिनेट बैठकीनंतर निर्णय घेतला जाणार आहे. 

खुर्चीची लालसा  नाही - सोरेनझारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पत्रकारांना सांगितले की, कोणतेही अघटित घडणार नाही. कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यासाठी सत्ताधारी तयार आहेत. अनेक वेळा रणनीतीनुसार काम केले जाते. त्याची छोटीशी झलक आपण पाहिली. मला खुर्चीची लालसा नाही, त्यामुळे तणाव नाही.

हवाईमार्गे छत्तीसगढमध्येयूपीए आमदारांना छत्तीसगढमध्ये नेले जाईल, अशी चर्चा होती. तथापि, त्या दिवशी तीन बसमधून यूपीए आमदारांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याबरोबर खुंटी जिल्ह्यातील लतरातू धरणावर नेण्यात आले होते. खुंटी, नेतरहाटमार्गे हे सर्व आमदार छत्तीसगढमध्ये जातील, अशी चर्चा होती. परंतु त्यावेळी तसे न हाेता मंगळवारी आमदारांना हवाईमार्गे नेण्यात आले.

nराज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना सत्ताधारी आमदार राज्याबाहेर जात आहेत, हे विशेष. एकीकडे दुमकामध्ये अंकिता हिला जिवंत जाळण्याच्या टनेबद्दल आक्रोश आहे. या घटनांमुळे भाजपने राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

झारखंडचा ‘महाराष्ट्र’ होणार नाही : अविनाश पांडेनवी दिल्ली : आमदारांना आमिष दाखवून महाराष्ट्रात सत्ताबदल करण्यात भाजपला यश आले. त्याप्रमाणे ‘ऑपरेशन लोटस’ झारखंडमध्ये यशस्वी होणार नाही, असा दावा काँग्रेसचे झारखंडचे प्रभारी व माजी खासदार अविनाश पांडे यांनी केला आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विधानसभा सदस्यत्वाबद्दल वाद उत्पन्न झाला आहे. यासंदर्भात झारखंडच्या राज्यपालांनी अद्यापही निर्णय घेतलेला नाही. परंतु झारखंडमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ करण्याचा निश्चय भाजपने केल्याचा दावा अविनाश पांडे यांनी केला आहे. यूपीएचे सारे आमदार एकजूट असल्याचा दावा त्यांनी केला.

टॅग्स :JharkhandझारखंडBJPभाजपा