शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

साध्वींच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

By admin | Published: December 03, 2014 1:33 AM

केंद्रीय अन्नप्रक्रिया राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे विरोधक आक्रमक बनले असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून प्रथमच सरकारची संसदेत कसोटी लागणार आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीकेंद्रीय अन्नप्रक्रिया राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे विरोधक आक्रमक बनले असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून प्रथमच सरकारची संसदेत कसोटी लागणार आहे.साध्वींनी संसदेत माफी मागितली आणि लोकसभेचे कामकाज सुरळीत झाले मात्र सरकारचे संख्याबळ कमी असलेल्या राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले. साध्वींच्या विधानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी कमालीचे नाराज झाले असून त्यांनी देशाला संबोधित करण्याचे काम तुम्ही करू नका, यापुढे अशा प्रकारची बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराच पक्षखासदारांना दिला आहे. पंतप्रधानांच्या निवेदनामुळे विरोधकांची नाराजी कमी झालेली नाही. विरोधकांना राज्यसभेत एकवटण्याची संधीही यानिमित्ताने मिळाली आहे. राज्यसभेतील अल्पमत विचारात घेत अरुण जेटली यांनी साध्वी निरंजन ज्योती यांना माफी मागायला लावली. साध्वींनी लोकसभेतही माफी मागत या प्रकणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.विरोधक एकवटले...राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने संसदेत आणि बाहेर निदर्शने करीत आक्रमकता दाखविली असतानाच समाजवादी पक्ष, बसपा, संजद, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि अन्य पक्षांची एकजूट झाल्याचे दिसून आले. राज्यसभेत विरोधक भक्कम झाल्याचे दिसून आले. साध्वींनी राजीनामा दिल्याखेरीज सभागृहाचे कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. संतापजनक विधानतुम्हाला रामजाद्यांचे सरकार हवे की हरामजाद्यांचे असे विधान साध्वींनी दिल्लीत प्रचारसभेत केले होते. साध्वींनी गुन्हा केला असून याप्रकरणी तपास पूर्ण होईपर्यंत त्या मंत्रिपदावर कायम राहू शकत नाही, असे माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी म्हटले. साध्वींनी संसदेत कोणतेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही. बाहेर केलेल्या विधानाबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे, असे सांगत जेटलींनी विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. > दिल्लीकरांनी मत देताना ‘रामाचा सुपुत्र ’आणि ‘अनौरस’ यापैकी एकाची निवड करावी, असे वक्तव्य साध्वींनी केले होते. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी ज्योती यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला़ तसेच ज्योती यांना बडतर्फ करण्याची मागणी लावून धरली़ या गोंधळामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज अनेकदा तहकूब करावे लागले़> लोकसभेत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हा मुद्दा उपस्थित करीत कार्यस्थगनाचा प्रस्ताव मांडला़ मंत्र्यांचे वक्तव्य आक्षेपार्ह आहे़ देशात जातीय तणाव असताना एका जबाबदार मंत्र्यांने असे वक्तव्य करणे गैर आहे़ याबाबत त्यांनी माफी मागावी, असे ते म्हणाले़ पण लोकसभाध्यक्षांनी कार्यस्थगनाचा प्रस्ताव नामंजूर केला़ बसपा प्रमुख मायावती व माकपा नेते सीताराम येचुरी यांनी साध्वी निरंजन ज्योतींविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली़