शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
2
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
3
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
4
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
5
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
6
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
7
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
8
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
10
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
11
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
12
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
13
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
14
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
15
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
16
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
17
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
18
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
19
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
20
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून

विरोधकांची ‘ईडी’वर धाड; बॅरिकेड्स अन् प्रचंड फौजफाट्याने मोर्चा अडवला, जेपीसीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 6:24 AM

काँग्रेससह १६ विरोधी पक्षांच्या या मोर्चात तृणमूलचा सहभाग नव्हता.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : अदानी प्रकरणाच्या संसदीय समिती चौकशीची (जेपीसी) मागणी करत संसद भवनापासून ईडी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढणाऱ्या काँग्रेससह १६ विरोधी पक्षांच्या नेत्यांना दिल्ली पोलिसांनी बुधवारी बॅरिकेड्स उभारून विजय चौकाजवळ रोखले. पुढे जाणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विरोधकांनी मोर्चा स्थगित केला.

पोलिसांनी ध्वनिक्षेपकाचा वापर करून आंदोलक खासदारांना क्षेत्र रिकामे करण्याचे आवाहन केले. जेव्हा नेते बॅरिकेड ओलांडू शकले नाहीत, तेव्हा त्यांनी आपला मोर्चा मागे घेतला. विरोधी पक्षांच्या या मोर्चात तृणमूलचा भाग नव्हता. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती वाढल्याच्या निषेधार्थ त्यांच्या खासदारांनी संसद भवन संकुलातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली.

सरकार लोकशाही कमकुवत करतेय : काँग्रेस

मोदी सरकारवर एका उद्योगपतीला वाचवण्यासाठी संसदेचे कामकाज ठप्प करून देशातील लोकशाही पोकळ आणि कमकुवत केल्याचा आरोप केला. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सरकार संसदेत जे काही करत आहे, ते देशातील लोकशाहीचा ऱ्हास होत असल्याचा पुरावा आहे.

संसदेत ‘ॲक्शन रिप्ले’ 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही आदल्या दिवशीच्या कामकाजाचा ‘ॲक्शन रिप्ले’ दाखवल्यासारखे कामकाज झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लंडनमधील वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी रान उठवले, तर विरोधकांनी अदानी प्रकरणात संसदीय समिती चौकशीची (जेपीसी) मागणी लावून धरली. गदारोळातच दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करावे लागले.

‘इलारा’-अदानी’बद्दल प्रश्नचिन्ह

- अदानी समूहाचा मोठा गुंतवणूकदार याच कंपनीच्या संरक्षणविषयक कंपनीत भागीदार असल्याचा दावा करणाऱ्या एका वृत्ताबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला. 

- ‘इलारा इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड’ ही कंपनी मॉरिशसमध्ये नोंदणीकृत चारपैकी एक कंपनी आहे, जी अदानी ग्रुप ऑफ कंपनीजची प्रमुख भागधारक आहे. बंगळुरूस्थित संरक्षण कंपनी ‘अल्फा डिझाइन टेक्नॉलॉजी’मध्ये अदानी समूहासोबत एलारा आयओएफ मालकांपैकी एक आहे.  

- इस्रो आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) या कंपनीशी जवळून काम करते. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड का केली जात आहे, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

भारतातील लोकशाहीवर हल्ले चढविण्यात येत आहेत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली होती.सरकारवर देशात किंवा परदेशात टीका करण्याचा नागरिकाला हक्क आहे. त्यासाठी त्याला देशविरोधी ठरविता येणार नाही,नागरिकाने आपल्या सरकारवर देशात किंवा परदेशात टीका करणे ही काही नवीन घटना नाही. मोदी यांनीही विदेश दौऱ्यांमध्ये आपल्या विरोधकांवर टीका होती. - कपिल सिब्बल, राज्यसभेचे खासदार  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ParliamentसंसदEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय