शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

"विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीने झारखंडमध्ये सरकार पडण्यापासून वाचवलं"; राहुल गांधींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2024 11:09 AM

"भाजपाला आम्ही घाबरत नाही, लढत राहतो"

Jharkhand Politics, Rahul Gandhi vs BJP: झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. सर्वप्रथम मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे दिल्लीला गेले आणि बेपत्ता असल्याचे समजले. त्यानंतर त्यांना ईडीने अटक केली. झारखंडमध्ये सरकार कोसळणार अशी चर्चा रंगू लागली. त्यात चंपई सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली, तरी राज्यातील राजकीय तापमान शांत झालेले नाही. ३६ आमदारांना हैदराबादला हलवण्यात आले आहे. कारण महाआघाडीचे आमदार फोडण्याचा धोका आहे. या दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक दावा केला आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीमुळेच झारखंडमध्ये सरकार पाडण्यात भाजपाला यश मिळाले नाही असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, झारखंडमधील जनतेने दिलेला जनादेश वाया घालवण्यापासून भाजपाला रोखण्यात इंडिया आघाडी यशस्वी झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आपल्या भारत जोडो न्याय यात्रेला शनिवारी झारखंडमधील गोड्डा येथील सरकंदा चौकातून सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी विधान केले.

"भाजपने मनी पॉवर आणि तपास यंत्रणांचा वापर केला. आम्ही भाजपला घाबरत नाहीत आणि फुटीर विचारसरणीशी लढत राहतो. पूर्वीची भारत जोडो यात्रा आरएसएस आणि भाजपच्या 'विभाजनकारी अजेंड्या'च्या विरोधात होती, परंतु सध्याची यात्रा देशातील जनतेला न्याय देण्याची मागणी करणारी आहे. झारखंडमध्ये निवडून आलेले सरकार अस्थिर करण्याचा भाजपने प्रयत्न केला. पण इंडिया आघाडीने तसे होऊ दिले नाही," असे राहुल गांधी स्पष्ट शब्दांत म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "भारत आघाडीने पक्षाला जनादेश चोरू दिला नाही. महागाई आणि वाढती बेरोजगारी यासह देशभरात मोठ्या प्रमाणावर अन्याय दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारतात तरुणांना रोजगार मिळणे अशक्य आहे. देशातील बेरोजगारीचा दर 40 वर्षांतील सर्वाधिक आहे. तुमची 'मन की बात' आम्ही ऐकतो, पण आमच्या मनात जे आहे ते तुम्ही सांगू नका, आमचे ऐकत चला."

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीJharkhandझारखंडBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी