शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

मुस्लिमांचे प्रश्न टाळणे विरोधी पक्षांना महागात पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 05:23 IST

लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना पुन्हा एकदा सपाटून मार खावा लागला.

- अ‍ॅड. फिरदोस मिर्झा (सामाजिक कार्यकर्ते)लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना पुन्हा एकदा सपाटून मार खावा लागला. या अपयशासाठी त्यांनी मुस्लीम समाजाच्या प्रश्नांकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरले. मुस्लीम समाजाकरिता ही निवडणूक फार विचित्र होती. त्यांना या निवडणुकीत मुद्दाम रस नव्हता. त्यामागे विविध कारणे होती. सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी गेली पाच वर्षे सतत मुस्लिमांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मुस्लिमांवर सामूहिक हल्ले केले.गोरक्षणाच्या नावावर त्यांच्यावर अत्याचार केले. तिहेरी तलाकच्या माध्यमातून मुस्लिमांच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करण्यात आला. अशा गंभीर घटना घडत असताना विरोधातील एकाही पक्षाने आवाज उठवला नाही.दुसºया बाजूने सत्ताधाऱ्यांनी आरोपींना वाचविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. तसेच, या निवडणुकीत एकाही पक्षाच्या जाहीरनाम्यात मुस्लीम समाजाच्या विकासाचा मुद्दा नव्हता. सर्वत्र केवळ मुस्लीमविरोधी वातावरण होते. या निवडणुकीत मुस्लिमांना भाजपने फक्त ७ तर, काँग्रेसने २४ तिकिटे दिली. परंतु, त्यांना निवडून आणण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत.याउलट प्रज्ञासिंह ठाकूरसारख्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आली. गेल्या वेळी वायनाडमधून काँग्रेसचे एम. आय. शाहनवाज विजयी झालेहोते.या वेळी त्या जागेवर राहुल गांधी उभे राहिले. तसेच, बिहारमध्ये जिंकण्याची ताकद असणारे शकील अहमद यांचे तिकीट काँग्रेसने कापले. एवढेच नाही तर, विरोधी पक्षांच्या स्टार प्रचारकांमध्ये मुस्लिमांचा समावेश नव्हता. त्यांना प्रचारात उतरविण्याचे प्रयत्नदेखील झालेनाहीत.परिणामी, या निवडणुकीत मुस्लीम समाज तटस्थ राहिला व त्याचा फायदा भाजप व सहकारी पक्षांना मिळाला. देशात मुस्लिमांची संख्या १५ टक्के आहे आणि निकालाचे अवलोकन केल्यास विरोधी पक्षांनी चार ते पाच टक्के मतफरकाने जागा गमावल्याचे दिसते.या निकालाचा मुस्लीम समाजावर विविध बाबतीत प्रभाव पडेल. ते आता सरकारवर अवलंबून न राहता स्वत:च्या बळावर उभे होण्याचा प्रयत्न करतील. भविष्यातील पिढीला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणतील. तसेच, विशिष्ट गटाने जाणीवपूर्वक खराब केलेली प्रतिमा सुधारतील.या निवडणुकीत मुस्लीम समाज तटस्थ राहिला व त्याचा फायदा भाजप व सहकारी पक्षांना मिळाला. देशात मुस्लिमांची संख्या १५ टक्के आहे आणि विरोधी पक्षांनी चार ते पाच टक्के मतफरकाने जागा गमावल्या.