शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

विरोधकांची बेकी पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 05:42 IST

आजवरच्या सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा २०१९ ची लोकसभेची निवडणूक खूपच आगळीवेगळी होती.

- राजीव करंदीकरआजवरच्या सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा २०१९ ची लोकसभेची निवडणूक खूपच आगळीवेगळी होती. या निवडणुकीत विरोधी नेते आणि पक्षांचा ‘मोदींना विरोध’ हाच एकमेव राजकीय कार्यक्रम असतानाही त्यांच्यात कमालीची फाटाफूट दिसून आली. विरोधी पक्षांची अशीच स्थिती १९७७ मध्ये श्रीमती इंदिरा गांधी आणि १९८९ मध्ये राजीव गांधी यांच्याविरुद्ध अनुभवास आली होती.१९७७ मध्येही विरोधक एक होऊ शकले नव्हते. अशीच स्थिती १९८९ मध्येही प्रत्ययास आली; परंतु, या दोन्ही वेळी विरोधक सरकारच्या धोरणांविरुद्ध (आणीबाणी) आणि १९८९ मध्ये भ्रष्टाचाराच्या विरुद्ध होते. या वेळी मात्र सर्व विरोधी पक्ष मोदींविरुद्ध एकवटले होते.या वेळची निवडणूक एका अर्थाने मोदी यांच्यासाठी ‘सार्वमत’ अजमावणारीच होती. अर्थात, भाजप आणि मोदी यांनाही हेच अपेक्षित होत. मोदी यांच्यावर टीका करण्यावर लक्ष केंद्रित करून समस्त विरोधी पक्ष आणि नेतेमंडळी भाजप आणि मोदींच्या या सापळ्यात आपसूकच अडकत गेले.मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले असतानाही जनमत चाचणीतून मोदींची लोकप्रियता कायम असल्याचे स्पष्ट झाले होते. या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पदरी आलेल्या अपयशाने लोकसभा निवडणुकीत या राज्यांत भाजपला हादरा बसेल, असे संकेत मिळतात, असा विचार कोणीही करू नये, असे मी एका चर्चेप्रसंगी म्हटले होते.जानेवारीत घेण्यात आलेल्या विविध जनमत चाचणींतून २०१४ च्या तुलनेत या वेळी भाजपचा जनाधार आणि मोदींच्या प्रभावाला ओहोटी लागल्याचे संकेत देण्यात आले होते. विरोधक मोदींविरुद्ध एकवटतील आणि किमान समान कार्यक्रम घोषित करतील. सोबतच संयुक्तपणे सभा घेऊन एखाद्या नेत्याला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे आणून भाजप आणि मोदींना आव्हान देतील; परंतु, प्रत्यक्षात विरोधी पक्षांनी असे करणे टाळलेच. संसदीय पद्धत असताना विरोधकांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार आताच का निवडावा, असे काही राजकीय जाणकार म्हणायचे. त्यांचे म्हणणे तांत्रिकदृष्ट्या योग्य असले तरी मतदार याकडे अध्यक्षीय प्रणाली म्हणूनच बघतात आणि त्यानुसार मतदान करतात, अशी माझी धारणा आहे.पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा राष्टÑीय सुरक्षेचा मुद्दा पुढे आला. बालाकोटमधील हवाई हल्ला, पाकिस्तानचे एफ-१६ लढावू विमान पाडणे, विंग कमांडर अभिनंदनची पाकिस्तानच्या तावडीतून सहीसलामत सुटका अशा अनेक घडामोडी घडत असताना विरोधकांनी एअर स्ट्राइकच्या बाबतीत साशंकता व्यक्त करणे आणि त्यावरून भाजप आणि सरकारने विरोधकांवर पलटवार करून भाजपने राष्टÑीय सुरक्षाच निवडणुकीचा मुद्दा बनविला. या सर्व राजकीय घडामोडींमुळे मोदींची लोकप्रियता आणि भाजपचा जनाधार मार्चअखेर २०१४ च्या स्तरावर पोहोचला. या वेळी विरोधी पक्षाला मत देण्याचा विचार करणारे लोक पुन्हा भाजपकडे वळले.२००४ आणि २०१९ च्या निवडणुकीतील आणखी एक फरक म्हणजे वाजपेयींबद्दल आदर असणारे, मात्र त्यांचे कट्टर समर्थक नव्हते. आज मात्र हे चित्र पालटले आहे. मोदी समर्थक मात्र मोदींच्या विजयासाठी आग्रही दिसले. त्यांना ‘भक्त’ म्हटले गेले. हेच ‘भक्त’ मोदी यांचा विजय पक्का करण्यासाठी मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले होते.१४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील वैध मतदानापैकी एनडीएचा हिस्सा ५० टक्क्यांहून जास्त आहे. या राज्यांतील ३२६ पैकी २९४ जागा एनडीएने पटकावल्या आहेत.एकूणच भाजप, मोदी आणि शहा यांच्यासाठी हा महाविजय आहे. सर्व राज्यांसह देशाला प्रगती आणि समृद्धीच्या दिशेने नेण्याचे त्यांच्यापुढे आव्हान आहे.पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा राष्टÑीय सुरक्षेचा मुद्दा पुढे आला. बालाकोटमधील हवाई हल्ला, पाकिस्तानचे एफ-१६ लढाऊ विमान पाडणे अशा अनेक घडामोडी घडत असताना विरोधकांनी एअर स्ट्राइकच्या बाबतीत साशंकता व्यक्त करणे आणि त्यावरून भाजप आणि सरकारने विरोधकांवर पलटवार करून भाजपने राष्टÑीय सुरक्षाच निवडणुकीचा मुद्दा बनविला.(निवडणूक शास्त्र अभ्यासक)