शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विरोधकांची इंडिया आघाडी एखाद्या फिल्टर कॉफीसारखी - तृणमूलचे नेते शत्रुघ्न सिन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 09:45 IST

मागील निवडणुकांचा इतिहास लक्षात घेता आगामी लोकसभा निवडणुकांत काँग्रेस सत्तेवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तृणमूल काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले.

कोलकाता : विरोधकांची इंडिया आघाडी एखाद्या फिल्टर कॉफीसारखी आहे. मागील निवडणुकांचा इतिहास लक्षात घेता आगामी लोकसभा निवडणुकांत काँग्रेस सत्तेवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तृणमूल काँग्रेसचे नेते व खासदार तसेच प्रख्यात अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले.ते म्हणाले की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी देशभर काढत असलेल्या यात्रा क्रांतिकारी स्वरूपाच्या आहेत. लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या गेमचेंजरची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. निवडणूक रोखे हा भाजपने केलेला खूप मोठा भ्रष्टाचार आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले की, इंडिया आघाडीमध्ये देशभरातील अनेक पक्षांचा समावेश आहे. त्यामुळेच या आघाडीला मी फिल्टर कॉफी म्हणतो. आणखी विरोधी पक्ष जर या आघाडीत सामील झाले तर या फिल्टर कॉफीची लज्जत आणखी वाढेल. काँग्रेस हा जुनाजाणता पक्ष असून,  तो राष्ट्रीय पक्ष आहे हे अमान्य करता येणार नाही, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)

‘सात टप्प्यातील मतदान हे विराेधकांसाठी वरदान’शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, सात टप्प्यातील निवडणुका विरोधी पक्षांसाठी भगवा कॅम्पच्या खंडणी आणि ब्लॅकमेल रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी एक वरदान आहे. एनडीएला सीबीआय, ईडी, आयकर यांचा पाठिंबा आहे, तर इंडिया आघाडीच्या पाठीशी जनता उभी आहे. इंडिया आघाडीमध्ये घटक पक्षांची फार संख्या नाही असे अनेकांना वाटते. मात्र, या आघाडीला जनतेचा मोठा पाठिंबा आहे. देशाच्या अनेक भागांत इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.  

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४West Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४