शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

"रस्त्याच्या मधोमध गो तस्करांना गोळ्या घालण्याचे आदेश..."; कर्नाटकच्या मंत्र्यांनी इशारा दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 16:29 IST

कर्नाटक सरकार गायींच्या तस्करीविरोधात अॅक्शनमोडमध्ये आले आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यात गायी तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

देशात काही ठिकाणी गायींच्या तस्करी सुरू आहेत. कर्नाटकातही तस्करी वाढल्या आहेत, यावर आता कर्नाटक सरकार अॅक्शनमोडमध्ये आले आहे. तस्करांना सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घातल्या जातील, असं विधान एका कर्नाटक मंत्र्याने केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा; डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

गायी तस्करांना कर्नाटकचे मंत्री मंकल एस वैद्य यांनी इशारा दिला आहे. गायी तस्करांना सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घातल्या जातील, असा इशारा त्यांनी दिला. जिल्ह्यात तस्करी चालू देणार नाहीत, असे मंत्र्यांनी सांगितले. प्रशासन गायी आणि त्या पाळणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे, असं आश्वासनही त्यांनी दिली. येथील होन्नावरजवळ काही दिवसापूर्वी एका गायीची हत्या झाली. या प्रकरणी झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी हे विधान केले.

मंत्री वैद्य म्हणाले, गायींची तस्करी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. मी एसपींना सांगितले आहे की, हे थांबले पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत असे होता कामा नये. आपण गायींची पूजा करतो. आम्ही या प्राण्याला प्रेमाने वाढवतो. आपण त्याचे दूध पिऊन मोठे झालो आहोत. 

कडक कारवाई केली जाणार

माध्यमांसोबत बोलताना मंत्री वैद्य म्हणाले की, त्यांनी पोलिसांना यामागील कोणीही असो, त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. जर या गोष्टी सुरू राहिल्या तर आरोपींना रस्त्यावर गोळ्या घालून ठार मारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.  

टॅग्स :Karnatakकर्नाटकcowगाय