शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

... अन्यथा रामायण बंगल्यासमोरच खड्डे करू, राष्ट्रवादीचा गर्भीत इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 17:02 IST

युवक राष्ट्रवादीच्यावतीने महापालिका सत्ताधारी व प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनदेखील रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरातील खड्ड्यांचे श्राद्ध घालत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले.

ठळक मुद्देपावसाच्या पाण्यामुळे पडलेल्या खड्ड्यांसोबत गॅस पाईपलाईन, वायरी व पावसाळी गटार या कामांसह विविध कामांच्या नावाखाली खोदलेल्या रस्त्यांमुळे नाशिककर त्रस्त झाले आहेत

नाशिक - रस्त्यातील खड्डे हा विषय महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील गंभीर समस्या बनली आहे. त्याला नाशिकही अपवाद नाही. त्यामुळेच, नाशिककर या रस्त्यांमधील खड्ड्यांना चांगलंच वैतागले आहेत. त्यातूनच युवक राष्ट्रवादीने रामायण बंगल्यासमोरच खड्डे पाडण्याचा गर्भीत इशारा दिला आहे. नाशिक शहरातील सर्व खड्डे पुढील पंधरा दिवसात बुजवा अन्यथा रामायण बंगला, स्थायी समिती सभापती व सत्ताधारी नगरसेवकांच्या घरासमोर खड्डे करू असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी महापालिका सत्ताधाऱ्यांना दिला.

युवक राष्ट्रवादीच्यावतीने महापालिका सत्ताधारी व प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनदेखील रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरातील खड्ड्यांचे श्राद्ध घालत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. तरीही, सुस्त सत्ताधाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे, महापौर, विभाग सभापती व सत्ताधारी नगरसेवक यांनी कुठलेही काम केलेले नसून यांची येत्या पंधरा दिवसात रस्त्यांवरील खड्डे न बुजविल्यास युवक राष्ट्रवादी रामायण बंगला, स्थायी समिती सभापती व सत्ताधारी नगरसेवकांच्या घरासमोर खड्डे करणार आहे. तसेच या आंदोलनानंतरही खड्डे न बुजविल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवत जाणार असल्याचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.

नाशिकची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या या शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसाच्या पाण्यामुळे पडलेल्या खड्ड्यांसोबत गॅस पाईपलाईन, वायरी व पावसाळी गटार या कामांसह विविध कामांच्या नावाखाली खोदलेल्या रस्त्यांमुळे नाशिककर त्रस्त झाले आहेत. शहरातील खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात घडत आहे. जनतेच्या कोट्यावधी रुपयांचे रस्ते एकाच पावसात खड्डेमय झाल्याने खुद्द भाजपा आमदार यांनी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नाशिकमध्ये आले असता, महापालिका प्रशासनाने शहरातील खड्ड्यात माती व मुरूम टाकून मलमपट्टी केली. पण, पावसाच्या पाण्यामुळे माती वाहून जात सर्वत्र चिखल झाला आहे. 

दरम्यान, दिवाळीचा सण जवळ येत असल्याने नाशिककर खरेदीकरिता घराबाहेर पडत आहे. पण, त्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्यांना प्रचंड त्रास होत असल्याने कमरेचे व मणक्याचे आजार उद्भवू लागल्याकडेही खैरे यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :NashikनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाroad transportरस्ते वाहतूक