शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
2
सुप्रिया सुळेंच्या कारमधून चेहरा लपवून जाणारा 'तो' नेता अजित पवार गटाचा?; नाव समोर
3
हरयाणा निकालानंतर मविआत भूकंप?; संजय राऊत- नाना पटोले यांच्यात शाब्दिक 'वॉर'
4
काँग्रेस दिल्लीत एकटी पडणार, आप 'हात' सोडणार; विधानसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान
5
Kolkata Doctor Case : फक्त २९ मिनिटं... आरोपीच्या जीन्स, शूजवर ट्रेनी डॉक्टरचं रक्त; CBI च्या आरोपपत्रात मोठा खुलासा
6
कॉलर पडकली अन् थप्पड लगावली, पोलिसांसमोरच भाजपा आमदाराला मारहाण, कारण काय?
7
PAK vs ENG : एकच नंबर! जो रुट इंग्लंडचा नवा 'हिरो', कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
8
अजित पवारांच्या मनात नेमकं काय?; भरसभेत रोहित पवारांचं कौतुक केल्यानं संभ्रम
9
Bigg Boss 18 : सलमान खान टीव्हीचा सर्वात महागडा होस्ट? फीस जाणून थक्क व्हाल!
10
हरयाणात मोठा विजय मिळवूनही भाजपला कसा बसला धक्का? विधानसभा अध्यक्षांसह १० पैकी ८ मंत्र्यांचा पराभव
11
Mumbai Best Bus Accident: "तुमच्या मुलाला बसने उडवलंय", एक फोन अन् बाप धावला, पण...; वांद्र्यातील धक्कादायक घटना!
12
नवव्या वर्षी वडिलांच छत्र हरपलं! कुस्ती, वाद, प्रसिद्धी अन् आमदार; वाचा विनेश फोगाटचा प्रवास
13
Video - 'वडापाव गर्ल'नंतर आता 'मॉडेल चहावाली' झाली फेमस; डॉली चहावाल्याला देतेय टक्कर
14
मिशन विधानसभा! सोलापूर जिल्ह्यासाठी शरद पवारांकडून ६१ नेत्यांच्या मुलाखती; दोन चेहऱ्यांनी लक्ष वेधलं
15
"या अनपेक्षित निकालाने..."; हरयाणातल्या पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
16
"मी तिला मारलं नसतं तर तिने मला..."; महालक्ष्मीचे ५० तुकडे करणाऱ्याच्या नोटमध्ये धक्कादायक दावा
17
शरद पवारांचा हरियाणात एकमेव उमेदवार; 'तुतारी' चिन्हावर किती मतं मिळवली?
18
'या' दिवशी गुंतवणूकीसाठी खुला होणार देशातील सर्वात मोठा IPO; प्राईस बँड किती? ग्रे मार्केट प्रीमिअम देतोय टेन्शन
19
खळबळजनक! IPS अधिकाऱ्याचं लोकेशन ट्रॅक करणाऱ्या ७ पोलिसांचं निलंबन, काय आहे प्रकार?
20
ठाकरेंचं सरकार मीच पाडलं! 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचा गौप्यस्फोट, म्हणाले- "सहा महिने एसटी आंदोलन..."

‘आउटडेटेड’ सरकार लोकांनीच नाकारले; पंतप्रधान मोदी यांची ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’मध्ये टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 6:20 AM

बॅटरी चार्ज करून किंवा बदलूनही उपयोग नव्हता. त्यामुळे २०१४ मध्ये लोकांनी असे कालबाह्य ‘फोन’ सोडून दिले आणि आम्हाला सेवा करण्याची संधी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ‘२०१४ हे वर्ष केवळ तारीख नसून बदल आहे. लोकांनी तत्कालीन ‘आऊटडेटेड’ सरकारला जुन्या स्क्रीन असलेल्या फोनप्रमाणे नाकारले आणि आमच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला संधी दिली,’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केली. 

येथे ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’ मधील आपल्या भाषणातील आकडेवारीचा हवाला देत मोदी यांनी भारत मोबाइल फोनचा आयातदार असताना निर्यातदार कसा बनला आणि ॲपलपासून गुगलपर्यंतच्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या देशात उत्पादन बनण्यास कशा तयार आहेत, याची माहिती दिली. 

मोदी म्हणाले, “वर्ष २०१४ मध्ये, आमच्याकडे... मी २०१४ का म्हणतोय... ती तारीख नाही, तर बदल आहे. २०१४ पूर्वी भारतात काही शेकड्यांत स्टार्टअप होते पण आता ही संख्या एक लाखाच्या आसपास पोहोचली आहे.

जग आता ‘मेड इन इंडिया’ फोन वापरतेय 

सर्वात वेगवान ५ जी मोबाइल टेलिफोन नेटवर्क लाँच केल्यानंतर, भारत ६ जी क्षेत्रात एक आघाडीचा देश म्हणून प्रस्थापित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. जग आता ‘मेड इन इंडिया’ फोन वापरत आहेत, असेही मोदी म्हणाले. मोबाइल ब्रॉडबँड गतीच्या बाबतीत भारत ११८ व्या स्थानावरून ४३ व्या स्थानावर गेला आहे असा उल्लेखही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केला.

बॅटरी चार्ज करून किंवा बदलूनही उपयोग नव्हता...

२०१४ पूर्वीच्या दिवसांची आठवण करून देताना मोदी म्हणाले की, त्यावेळी ‘आऊटडेटेड फोन’ची स्क्रीन वेळोवेळी हँग व्हायची. तुम्ही कितीही स्क्रीन स्वाइप केली किंवा कितीही बटणे दाबली तरी काहीही परिणाम होत नव्हता... आणि त्यावेळच्या सरकारचीही अशीच परिस्थिती होती. त्यावेळेस भारतीय अर्थव्यवस्था किंवा तत्कालीन सरकारचीच म्हणायला हवे, परिस्थिती इतकी बिकट होती की, पुन्हा सुरू करूनही फायदा झाला नाही. बॅटरी चार्ज करून किंवा बदलूनही उपयोग नव्हता. त्यामुळे २०१४ मध्ये लोकांनी असे कालबाह्य ‘फोन’ सोडून दिले आणि आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. या बदलामुळे काय झाले तेही स्पष्टपणे दिसून येत आहे.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी