शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

‘अ‍ॅटलस सायकल’च्या शेवटच्या कारखान्याचे ‘पॅडल’ थांबले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 05:14 IST

‘जागतिक सायकलदिनी’च थांबविले उत्पादन

नवी दिल्ली : एकेकाळी देशात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘अ‍ॅटलस सायकल’ने दिल्लीजवळील साहिबाबाद येथील आपला शेवटचा सायकल उत्पादक कारखाना बंद केला आहे. कंपनीने ३ जून रोजी या प्रकल्पातील काम थांबविले. योगायोग म्हणजे त्यादिवशी ‘जागतिक सायकल दिन’ होता. कंपनीने शेवटच्या ४३१ कर्मचाऱ्यांनाही काढून टाकले आहे.

याआधी मालनपूर आणि सोनिपत येथील प्रकल्प कंपनीने बंद केले आहेत. १९५१ साली सोनिपत येथील प्रकल्पानेच कंपनीची सुरुवात झाली होती. १९८२ साली दिल्लीतील आशियाई खेळांसाठी कंपनीने सायकली पुरविल्या होत्या.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीएमडी) एन. पी. सिंह राणा यांनी सांगितले की, कारखाना हंगामी स्वरूपात बंद करण्यात आला आहे. कंपनीकडे वापर नसलेला एक भूखंड पडून आहे. तो विकून ५० कोटी रुपये उभे केले जातील. त्यानंतर कारखाना पुन्हा सुरू केला जाईल.

काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना दैनिक हजेरीच्या आधारावर निलंबन कालावधीचे वेतन नियमानुसार दिले जाईल. हे वेतन किती असेल याचा खुलासा राणा यांनी केला नाही. तथापि, निलंबन कालावधीत साधारणत: मूळ वेतनाच्या ५० टक्के हिस्सा आणि महागाई भत्ता दिला जातो. साहिबाबाद येथील हा प्रकल्प कंपनीचा सर्वांत मोठा सायकल उत्पादक प्रकल्प होता. येथे १९८९ मध्ये सायकल उत्पादन सुरू करण्यात आले होते. येथे दरमहा दोन लाखांपेक्षा अधिक सायकलींचे उत्पादन होत होते. दरम्यान, कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता कारखाना बंद केल्याचा आरोप कर्मचाºयांनी केला आहे.च्कंपनीने बुधवारी गेटवर चिकटवलेल्या नोटिसीत म्हटले की, गेल्या अनेक वर्षांपासून कंपनी भांडवलासाठी संघर्ष करीत आहे. कारखाना चालविण्यासाठीही कंपनीकडे पैसे नाहीत.च्कच्चा माल खरेदी करण्यातही आम्ही असमर्थ आहोत. अशा परिस्थितीत कारखाना चालू ठेवणे अशक्य आहे. कर्मचाºयांना सुट्या वगळून हजेरी भरण्यास सांगण्यात आले आहे.